पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर पैसे जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
पूना मर्चंटस चेंबरच्या वतीने आयाेजित रास्त दरात लाडू चिवडा उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी (ता. १४) मंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री देशमुख म्हणाले, की कर्जमाफीसाठीच्या अर्जांची अंतिम मुदत संपल्यानंतर सहकारी आणि राष्ट्रीयकृत बॅंकांद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती संकलित करण्यात आली. त्याची छाननी झाली आहे. आता कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बॅंकांकडून आलेल्या खात्यांच्या माहितीची छाननी पूर्ण झाली आहे, अशा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा करणार आहाेत. यासाठी सहकार विभाग आणि संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री प्रयत्नशील आहे.
गेल्या वर्षी तूर खरेदीमध्ये व्यापाऱ्यांची तूर माेठ्या प्रमाणावर खरेदी झाली. अशी स्थिती यंदा हाेऊ नये यासाठी तूर, मूग आणि उडीद खरेदीचे वेळापत्रक करण्यात येणार आहे. त्यानुसार आॅनलाइन नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांना माेबाईलवर फाेन करून आणि मसेज देऊन विक्रीसाठीचा दिवस आणि वेळ देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना रांगेत उभे राहून हाेणारा त्रास हाेणार नाही, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.
टेक्सटाईल पार्कबाबत हाेणाऱ्या आराेपांविषयी मंत्री देशमुख म्हणाले, की ग्रामीण भागात राेजगार उपलब्ध व्हावा यासाठी टेक्सटाईल पार्क उभारण्यात येत आहे. यामध्ये काेणताही गैरव्यवहार झालेला नसून, चुकीची माहिती देणाऱ्यांनी माहिती घ्यावी.