नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला. मात्र, ‘कोरोना’मुळे व्यापारी व मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने काढणी हंगाम लांबणीवर गेला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या बागा खाली झाल्या आहेत. त्यांनी पुढील हंगामाच्या नियोजनासाठी खरड छाटण्या सुरू केल्या आहेत. ज्यांच्या बागा काढणीविना आहेत, त्यांची लगबग सुरू आहे. मात्र, खरड छाटणीसाठी मजूर नसल्याने अडचणी येत आहेत.
अतिवृष्टीमुळे सप्टेंबरमधील छाटण्या फुलोरा अवस्थेत घडकुज, घड जिरने, डाऊनी अशा समस्यांनी ग्रासल्या. अशा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतले. मात्र, ‘कोरोना’मुळे उठाव नसल्याने दिंडोरी, निफाड, चांदवड, सिन्नर, नाशिक व येवला तालुक्यातील अनेक बागा काढणीविना आहेत. त्यामुळे माल स्थानिक व्यापाऱ्यांना दिला जातोय. तर, काहींचा बेदाणा करण्यात येत आहे.
वेळेवर खरड छाटण्या न झाल्यास प्रकाश संश्लेषण, अन्नद्रव्य निर्मिती, यात अडचण येण्याची शक्यता आहे. गर्भधारणा अडचणीत येऊ शकते. त्यामुळे पुढील हंगामातील कामे लांबणीवर जाऊ नयेत, यासाठी आहे त्या दरात माल खाली करून छाटण्यां करणे सुरू आहे. द्राक्ष उत्पादक हंगामातील नियोजन बिघडणार नाही, यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, अशा परिस्थितीत पेठ, सुरगाणा या भागातील मजूर गावी परतले आहेत. त्यामुळे कामांत अडचणी येत आहेत. आता स्थानिक मजुरांमार्फत कामे सुरू आहेत. मात्र, कामांची गती कमी झाल्याची स्थिती आहे. अशा आहेत अडचणी..
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.