कोल्हापूर जिल्ह्यात  भारत बंदला संमिश्र प्रतिसाद  In Kolhapur district India Bandla Composite response
कोल्हापूर जिल्ह्यात  भारत बंदला संमिश्र प्रतिसाद  In Kolhapur district India Bandla Composite response 
मुख्य बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात  भारत बंदला संमिश्र प्रतिसाद 

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : शेतकरी आणि कामगारांच्या विरोधातील केंद्रातील भाजप सरकारला २०२४च्या निवडणुकीत गाडण्याचा निर्धार सोमवारी (ता.२७) महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने ऐतिहासिक बिंदू चौकात करण्यात आला. भाजप वगळता सर्वपक्षीय भारत बंदला कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले. सुमारे २०हून अधिक विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे किराणा भुसारीसह केशकर्तनालय सुद्धा बंद होते. वाहतूक व्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नाही. एसटी बसही इतर वाहतूक शहरासह जिल्ह्यात सुरळीत होती.  काँग्रेस पक्षाच्या वतीने कोल्हापूर शहरात रॅली काढून पदाधिकारी बिंदू चौकात आले तर संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांसह अन्य छोट्या-मोठ्या संघटनांनी बिंदू चौकात भाजप विरोधी वज्रमूठ कायम ठेवण्याचा निर्धार केला.  ‘हम दो, हमारे दो’ असे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा उद्योगपती अंबानी आणि अदानी यांच्यामुळे शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात काळे कायदे होत आहेत. भविष्यात हेच कायदे सर्वसामान्य शेतकरी कामगारांना त्रासदायक ठरणार आहेत. म्हणूनच तब्बल दहा महिने दिल्लीमध्ये लढा देत असणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी एकमूठ बांधली असल्याचे मत ऐतिहासिक बिंदू चौकात राजकीय पक्षांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.  मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, भाजप सरकारचा धिक्कार असो, शेतकरी जगला पाहिजे, लोकशाही जगली पाहिजे, शेतकरी वाचवा देश वाचवा, शेतकरी कामगार विरोधी काळे कायदे रद्द झालेच पाहिजेत, अशा घोषणांनी बिंदू चौक दणाणून सोडला. पावसाच्या रिमझिम सरीमध्येही शेतकरी, कामगारांनी, नेत्यांनी व्यासपीठ सोडले नाही. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही राजकीय नेत्यांनी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रामक शैलीत भाषण करून २०२४ला परिवर्तन घडविण्याबाबत एकजूट ठेवण्याचे आवाहन सर्वांना केले.  माजी आमदार आणि निमंत्रक संपत पवार यांनी समारोपाच्या भाषणामध्ये उशिरा का होईना शेतकऱ्याची, कामगारांची व्यथा सर्वांना समजली आहे. सर्वांनी एकजुटीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्रित आंदोलनाला पाठिंबा दिला. हाच पाठिंबा भविष्यात प्रामाणिकपणे राहूदे, असेही आवाहन सर्वपक्षीय नेत्यांना आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना केले. 

भारत बंदच्या पाठिंब्यासाठी  सांगली धरणे आंदोलन 

सांगली : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारद बंदला पाठिंबा म्हणून सांगलीतील जुन्या स्टेशन चौकात सोमावर (ता.२७) धरणे आंदोलन करण्यात आले.  केंद्र सरकारने आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर तीन कृषी कायदे आणि केंद्रीय श्रम संहिता कायदा मंजूर केला आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु अजूनही सरकारने शेतकरी नेत्यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याची भूमिका घेतलेली नाही. म्हणून संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंदचे आवाहन केले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत आंदोलन झाले.  आदोलनात उमेश देशमुख, महेश खराडे, विकास मगदुम, डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, डॉ. माधुरी देशमुख, जानार्धन गोधळी, तुळशीराम गळवे, रेहाना शेख,, शोभा कोल्हे आदी सहभागी झाले. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आम आदमी पक्षाचे राजकुमार राठोड, आशपाक शेख यांनी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला. सेवा दलाचे सदाशिव मगदूम आणी त्यांच्या टीमने क्रांती गिते गायली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT