Kisan Railway should be stopped at Lasalgaon: Bhujbal
Kisan Railway should be stopped at Lasalgaon: Bhujbal 
मुख्य बातम्या

`किसान रेल्वे`ला लासलगावात थांबा द्यावा : भुजबळ

टीम अॅग्रोवन

नाशिक  : केंद्र शासनाच्या वतीने नुकतीच देवळाली ते दानापूर ही देशातील पहिली किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेला आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव रेल्वे स्थानकावर मात्र थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी असून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लासलगाव रेल्वे स्थानकात किसान रेल्वेला थांबा देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. 

याबाबत श्री. भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या वतीने देवळाली ते दानापूर पर्यंत देशातील पहिली किसान रेल्वे सुरू केली आहे. या माध्यमातून नाशवंत भाजीपाला व नाशिक जिल्ह्यातील फळांची उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये जलद वाहतूक करण्यात येऊन चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याने हा किसन रेल्वे उपक्रम कौतुकास्पद आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या या उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीला ही किसान रेल्वे आठवड्यातून एकदा चालू होती. परंतु मागणीमुळे ती आता आठवड्यातून तीनदा धावते. 

नाशिक जिल्हा व लगतच्या परिसरातील शेतकरी लासलगाव येथे आपला शेतीमाल लासलगाव मार्केट यार्ड येथे विपणन व साठवणीसाठी आणतात. त्यामुळे लासलगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने रेल्वे स्थानकात किसान रेल्वेला थांबा देण्याची नितांत आवश्यकता आहे. किसान रेल्वेला लासलगाव येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी श्री. भुजबळ यांनी पत्राद्वारे केलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT