खानदेशात कृषी विद्यापीठाचा मुद्दा ऐरणीवर
खानदेशात कृषी विद्यापीठाचा मुद्दा ऐरणीवर 
मुख्य बातम्या

खानदेशात कृषी विद्यापीठाचा मुद्दा ऐरणीवर

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात कृषी विद्यापीठाच्या स्थापनेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यातच कृषी विद्यापीठ जळगावात स्थापन व्हावे, अशी मागणी शेतकरी व शेतकरी संघटनेने केली आहे. तर कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे, अशी मागणी विद्यापीठ कृती समितीने केली आहे.  धुळे जिल्हा तसा लहान आहे. धुळ्यात कृषी महाविद्यालये अनेक वर्षांपासून आहेत. जळगाव मोठा जिल्हा असून, केळी, कपाशी, दूध उत्पादन व प्रक्रिया उद्योगांमध्ये जळगाव पुढे जात आहे. जागाही जळगाव जिल्ह्यात मिळू शकते. कृषी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने जळगावात सामर्थ्य असून, जळगावातच कृषी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे कडूअप्पा पाटील, प्रगतिशील शेतकरी शशिकांत पाटील (केऱ्हाळे, जि. जळगाव) यांनी केली आहे. कृषी विद्यापीठ जळगाव जिल्ह्यातच व्हावे यासाठी शेतकरी संघटना व काही प्रगतिशील शेतकरी मुख्यमंत्री, जलसंपदांत्री, कृषिमंत्री व माजी मंत्री यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली.  कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यात स्थापन करावे यासाठी सोमवारी धुळे जिल्ह्यातील कृषी विद्यापीठ कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्मरण धरणे आंदोलन केले. शासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (जि. नगर)चे विभाजन करून चार जिल्ह्यांसाठी कृषी विद्यापीठ उभारण्यासंबंधीच्या डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलू समितीच्या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी कृती समितीने धरणे आंदोलन करताना केली. धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्यास अनुकूल वातावरण असताना राहुरी येथे कृषी विद्यापीठ स्थापन केले. या मागणीसाठी येत्या २१ जानेवारी रोजी २०१६ धुळे जिल्ह्यातील सर्व कृषी महाविद्यालये बंद करून विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठ धुळ्यात स्थापन करण्याची मागणी केली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT