उमदी, जि. सांगली : एकीकडे कोरोनाचे थैमान; तर दुसरीकडे निकृष्ट बियाण्यांचा सुळसुळाट, यामुळे दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भुईमूग, बाजरी, मका पिकांच्या निकृष्ट बियाण्यांमुळे ‘पेरलं पण उगवलच नाही’ अशी जत तालुक्यातील पूर्व भागातील परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरलेले बाजरी, भुईमूग बियाणे उगवत नसल्याचा प्रकार समोर येत आहे.
जत तालुक्यात या वर्षी भुईमूग, बाजरी, मका पिकाच्या निकृष्ट बियाण्यांची विक्री झाल्याचे समोर येत आहे. तालुक्यातील पूर्व भागासह सर्वदूर भागातून मोठ्या प्रमाणात निकृष्ट बियाणांच्या तक्रारी येत आहेत. भुईमूग व बाजरीच्या बियाण्यांची उगवण झाली नाही. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
जत पूर्व भागासह तालुक्यात सर्वत्रच पेरणीयोग्य पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध जातींचे बियाणे विकत आणून पेरणी केली. मात्र, पेरलेले बियाणे उगवलेच नाही; तर काही ठिकाणी बियाणे अल्प क्षमतेने जमिनीवर उगवल्याचे दिसते. त्यामुळे दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांकडे आता पर्याय राहिलेला नाही. शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी आर्थिक अडचणींचा सामना लागणार आहे. निकृष्ट बियाणे विक्रेत्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.