जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे ३२१ खाते ‘आधार’विना
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे ३२१ खाते ‘आधार’विना 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे ३२१ खाते ‘आधार’विना

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली कर्जमुक्ती योजना अंमलबजावणीला अद्याप सुरुवात झालेली नाही. सहकारी बॅंकांसह राष्ट्रीयकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांच्या आधार संलग्नित असलेल्या खात्यांची माहिती मागविण्यात आली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये ३२१ खाती व जिल्हा बॅंकेची ६५ खाती आधाराविना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपली कर्जखाती आधारशी संलग्नित करून माहिती पाठविल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही. यामुळे आपली खाती आधारशी संलग्न करण्यासाठी शेतकरी बॅंकांमध्ये चकरा मारीत आहेत. जळगाव जिल्हा बॅंकेने ज्यांची खाती आधारशी संलग्न नाहीत, त्या शेतकऱ्यांची यादी संबंधित विभाग कार्यालयात लावली आहे. गटसचिवांचे आंदोलन मध्यंतरी सुरू असल्याने हे काम रखडले होते.  परंतु, नंतर हे आंदोलन मागे घेतल्यानंतर गटसचिवांनी आधारशी कर्जखाते संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेऊन संबंधित शेतकऱ्यांचे आधार क्रमांक मागवून घेतले. सध्या कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी गटसचिवांसह बॅंकांमध्ये तयार केली जात आहे.  जिल्हा बॅंकेने जशी कार्यवाही हाती घेतली, तशी कार्यवाही मात्र राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये सुरू नाही. संबंधित बॅंकेतील कृषी अधिकाऱ्याकडे याबाबतची जबाबदारी दिली आहे. या अधिकाऱ्याकडे कामाचा भार अधिक असल्याने कामात खोडा येत आहे. आधार क्रमांक स्वीकारण्यासाठी सकाळची वेळ काही बॅंकांनी दिली आहे. ग्रामीण भागातील शाखांमध्येही अशीच स्थिती असल्याने शेतकऱ्यांना दोन ते तीनदा बॅंकेत आधार संलग्न करण्यासाठी चकरा माराव्या लागत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT