विमा तर उतरविला; पण पावती आली कोरी
विमा तर उतरविला; पण पावती आली कोरी 
मुख्य बातम्या

विमा तर उतरविला; पण पावती आली कोरी

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : नावाला ऑनलाइन मात्र सारंच ऑफलाइन असलेल्या सेवेमुळे विमा उतरवण्यासाठी, तसेच सातबारा काढण्यासाठी अालेल्या शेतकऱ्यांची पंचाईत होताना दिसत आहे. जिल्ह्यातील रजापूरच्या सेतू व आपले सरकार केंद्रांवर तर विमा उतरविला; परंतु पावती कोरी आली अाणि खात्यातून पैसे कपात झाले. त्यामुळे ती कोरी पावती संबंधित शेतकऱ्याला द्यावी कशी, असा प्रश्न केंद्रचालकाला पडल्याने विमा उतरविणेच बंद ठेवावे लागल्याची स्थिती आहे.

पैठण तालुक्‍यातील रजापूरच्या सेतू सुविधा व आपले सरकार केंद्रावर बुधवारी (ता. १८) सकाळी परिसरातील देवगाव, रजापूर, दाभरूळ, एकतूनी, थापटी तांडा, देवगाव तांडा येथील शेतकऱ्यांनी विमा उतरविण्यासह ऑनलाइन सातबारा काढण्यासाठी हजेरी लावली. परंतु सातबारा काढण्यासाठी सेतू केंद्राची साइट ठप्प, भूमी अभिलेखच्या साइटची गती प्रचंड धीमी आणि डिजिटल सातबाराची साइट अंडर मेंटनन्स यामुळे शेतकऱ्यांना सातबारा मिळाला नाही.

केंद्रचालकाने रात्र जागून ज्यांचे सातबारे काढून ठेवले त्यांच्या हातीही विमा न भरता भूमी अभिलेखच्या साइटवरील सातबारावर स्वाक्षरी घेण्यासाठी तलाठ्यांचा शोध घेण्यापलीकडे हाती काही उरले नाही. शिवाय केंद्रचालक ज्ञानेश्वर कोठुळे यांनी देवगाव येथील दोन शेतकऱ्यांचा विमा १७ जुलैच्या रात्री महत्प्रयासाने रात्री उतरविला. त्या विम्याच्या रकमेपोटी त्यांच्या खात्यातील साडेचारशे व दोनशे रुपये कपात झाले. परंतु त्या विमा उतरविल्याची पावती मात्र कोरीच त्यांच्या हाती पडली. त्यानंतरही प्रयत्न केला असता असाच प्रकार झाला. त्यामुळे कोठुळे यांनी विमा भरणे बंद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT