खानदेशात शासकीय तूर खरेदीबाबतची मर्यादा वाढवा
खानदेशात शासकीय तूर खरेदीबाबतची मर्यादा वाढवा 
मुख्य बातम्या

खानदेशात शासकीय तूर खरेदीबाबतची मर्यादा वाढवा

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः खानदेशात तुरीचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी आले आहे. खरिपातील ज्वारी, मका, उडीद, मूग आदी पिकांना अतिपावसाचा फटका बसला, परंतु कोरडवाहू व बागायती क्षेत्रातील तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी हाती आले आहे. परंतु तुरीची शासकीय खरेदी करताना हेक्‍टरी सहा क्विंटल ६४ किलो एवढीच तूर खरेदी केली जाईल, असे निर्देश शासनाने दिले आहेत. या निर्देशात किंवा नियमात बदल करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  खानदेशात तुरीच्या उत्पादनात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, रावेर, चोपडा, जामनेर, पाचोरा, पारोळा हा भाग आघाडीवर आहे. तसेच, अनेक शेतकरी कापूस व इतर पिकांमध्ये आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पादन घेतात. यंदा पाऊस व्यवस्थित झाल्याने अवर्षण प्रवण भागासह हलक्‍या व मध्यम प्रकारच्या जमिनीच्या क्षेत्रातही तुरीचे चांगले, दर्जेदार उत्पादन हाती आले आहे. रावेर, मुक्ताईनगर भागांत तुरीचे ठिबकच्या माध्यमातून सिंचन करून शेतकरी उत्पादन घेतात. या भागात एकरी आठ ते नऊ क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहे. एकरी आठ क्विंटल उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची उर्वरित तूर बाजारात व्यापाऱ्यांच्या घशात जाईल. कारण, शासन हेक्‍टरी सहा क्विंटल ६४ किलो तूर खरेदी करणार आहे. बाजारात तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी म्हणजेच ४२०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. हे दर कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शासकीय खरेदी अजून सुरू झालेली नाही. यातच जाचक निकष लादल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. खानदेशात बहुसंख्य शेतकऱ्यांच्या तुरीचे उत्पादन हाती आले आहे. ते अधिक दिवस ते साठवू शकत नाहीत. अशा स्थितीत शासनाने तूर खरेदीचे निकष बदलावेत, लवकर तूर खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी रमेश पाटील (पिंप्री, जि. जळगाव) यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT