दुर्धर रोगांचा भारतीयांना विळखा
दुर्धर रोगांचा भारतीयांना विळखा 
मुख्य बातम्या

दुर्धर रोगांचा भारतीयांना विळखा

वृत्तसेवा

नवी दिल्ली ः भारतात गेल्या 25 वर्षांत हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह व कर्करोगासारखे विकार झपाट्याने वाढत आहेत. "द लेन्सेट' या वैद्यकीयविषयक मासिकात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. भारतातील बहुतेक राज्यांमध्ये हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधित आजार, मधुमेह, कर्करोगाचे प्रमाण 1990 ते 2016 या काळात वाढलेले दिसले आहे. देशात झालेल्या मृत्युंपैकी हृदयाशी संबंधित आजार व पक्षाघातामुळे झालेल्या मृत्युचे प्रमाण 1990 मध्ये 15.2 टक्के होते, ते 2016 मध्ये 28.1 टक्कांपर्यंत वाढले. यात 17. 8 टक्के मृत्यू हृदयरोगामुळे तर 7.1 टक्के मृत्यू पक्षाघातामुळे झाले. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयरोगामुळे मरण ओढावण्याचे प्रमाण जास्त आहे. पक्षाघाताचे प्रमाण मात्र दोन्ही गटात समान असल्याचे आढळले आहे. रक्तवाहिन्यांसंबंधित आजारामुळे देशात 1990 मध्ये 13 लाख रुग्णांचा मृत्यू झाला. हेच प्रमाण 2016 मध्ये 28 लाख होते. हा आजार झालेल्या रुग्णांची संख्या 1990 मध्ये 2.57 कोटींहून वाढून 2016 मध्ये 5.45 कोटी झाली आहे. केरळ, पंजाब व तमिळनाडूत याचा प्रसार सर्वाधिक होता. आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, गोवा व पश्‍चिम बंगालमध्येही या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसले.

रक्तवाहिन्यांच्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1990 : 13 लाख 2016 : 28 लाख

भारतात असंक्रमित रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहेच. मात्र तुलनेने अविकसित असलेल्या राज्यांमध्ये रक्तातील कमतरमुळे हृदयरोग व मधुमेहाच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे, ही गोष्ट अधिक चिंताजनक आहे. - प्रा. बलराम भार्गव, महासंचालक 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT