राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द 
मुख्य बातम्या

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द

टीम अॅग्रोवन

मुंबई: राज्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे आमदारपद उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरविले. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्यमंत्री खोतकर यांची आमदारकी रद्द झाल्याने हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी खोतकर यांनी मुदत उलटून गेल्यानंतर उमेदवारी अर्ज भरला, असा आरोप गोरंट्याल यांनी याचिकेत केला होता. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जुन खोतकर यांनी वेळ संपल्यानंतर स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ते निवडणूक लढवण्यास पात्र नाहीत, असे याचिकेत म्हटले होते. या याचिकेवर काल न्यायमूर्ती नलावडे यांनी निकाल दिला.

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये खोतकर अवघ्या २९६ मतांनी विजयी झाले होते. या निकालाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उच्च न्यायालयाकडून खोतकर यांना ४ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. मी अर्ज दाखल करण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरायला गेलो होतो. अर्ज भरण्यासाठी ३ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली असली तरी शेवटच्या दिवशी जितके जण निर्धारित वेळेत केंद्रावर दाखल होतात, त्या सर्वांचे अर्ज दाखल करून घेतले जातात. मी ३ वाजण्यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या परिसरात होतो. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या माझा अर्ज वैध ठरला पाहिजे, असे खोतकर म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT