हरियानात शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठीची प्रक्रिया सुरु; लवकर अहवाल
हरियानात शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठीची प्रक्रिया सुरु; लवकर अहवाल 
मुख्य बातम्या

हरियानात शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठीची प्रक्रिया सुरु; लवकरच अहवाल

टीम अॅग्रोवन

चंदीगड : हरियाना राज्यात शेतकऱ्यांना पेन्‍शन देण्यासंदर्भात अभ्यासासाठी विशेष समिती गठित करण्यात आली आहे. सदर समिती राज्यातील कृषी शास्त्रज्ञ आणि प्रगतिशील महिला शेतकऱ्यांची मते या विषयासंदर्भात जाणून घेणार आहेत.  हरियाना भाजपचे अध्यक्ष आणि तोहाना येथील आमदार सुभाष बराला हे या समितीचे अध्यक्ष आहेत. मंगळवारी (ता. २९) या समितीची तिसरी बैठक पार पडली. पुढील बैठकीत समिती राज्यातील कृषी शास्त्रज्ञ, प्रगतिशील महिला शेतकरी आदींची मते जाणून घेणार आहेत, तसेच या संदर्भातील सूचनांचा अहवालात अंतर्भाव करण्यात येणार आहे. समिती लवकरच मुख्यमंत्र्यांना आपला अहवाल सादर करणार आहे.  समितीची पहिली बैठक २७ डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती, दुसरी तीन आठवड्यांपूर्वी झाली होती. समितीत अध्यक्ष श्री. बराला यांच्यासह सत्ताधारी भाजपचे आमदार अभयसिंह यादव, महिपाल धांडा, घनश्‍यामदास अरोरा आणि पवन सैनी यांचा समावेश आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी, कृषी आणि शेतकरी विकास विभागाचे संचालक अजित बालाजी जोशी हेही या समितीत सदस्य आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाला शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करायची आहे. यापूर्वीच कॉँग्रेस, लोकदल या विरोधी पक्षांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्‍वासन दिले आहे. सत्ताधारी भाजप यामुळे राजकीय दबावात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT