प्लॅस्टिकबंदी करण्यावर गुजरात सरकार उदासीन
प्लॅस्टिकबंदी करण्यावर गुजरात सरकार उदासीन 
मुख्य बातम्या

प्लॅस्टिकबंदी करण्यावर गुजरात सरकार उदासीन

महेश शहा ः सकाळ न्यूज नेटवर्क

अहमदाबादः केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जागतिक पर्यावरण दिन प्लॅस्टिक प्रदूषणविरोधी दिन म्हणून पाळावयाचा निर्णय केला असला, तरी त्यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातेत मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. किंबहुना, प्लॅस्टिकबंदीबाबत राज्य सरकार अनुत्सुक असल्याचे चित्र आहे. गुजरातचा शेजारी असलेल्या महाराष्ट्राने प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे, पण रोजगार जाण्याचे कारण देत गुजरातेत मात्र त्यासंदर्भात चालढकल सुरू आहे. उच्च न्यायालयाने ताशेरे ओढूनही गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अद्याप प्लॅस्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी यंत्रणा नाही. राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री जयद्रथसिंह परमार यांचाच प्लॅस्टिकबंदीला विरोध आहे. त्यांच्या हलोल मतदारसंघात प्लॅस्टिक पिशव्यांचे सुमारे १५० कारखाने असण्याचे कारण त्यामागे आहे. थातूरमातूर प्रसिद्धीपेक्षा महाराष्ट्र आणि सिक्कीमच्या धर्तीवर गुजरातनेही प्लॅस्टिकवर बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरणवादी कार्यकर्ते महेश पंड्या यांनी केली आहे. बंदी असलेल्या प्लॅस्टिकची निर्मिती करणाऱ्या कारखानदारांच्या पाठीशी पर्यावरणमंत्रीच असणे, दुर्दैवाचे आहे. गुजरात मॉडेल राज्य असताना प्लॅस्टिबंदी का होत नाही, असा प्रश्‍न त्यांनी केला.     दरम्यान, महाराष्ट्राकडून प्रेरणा घेत गुजरातेतील अहमदाबाद आणि राजकोट महानगरपालिकांनी मंगळवार (ता.५)पासून प्लॅस्टिकबंदी जाहीर केली. जागतिक पर्यावरणदिनानिमित्त हा निर्णय करण्यात आला  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT