आपले सरकारचे संगणकचालक सात महिन्यांपासून मानधनाविना
आपले सरकारचे संगणकचालक सात महिन्यांपासून मानधनाविना 
मुख्य बातम्या

आपले सरकारचे संगणकचालक सात महिन्यांपासून मानधनाविना

टीम अॅग्रोवन

मुंबई : ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरू असलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (संग्राम) प्रकल्पात काम करणाऱ्या २५ हजार संगणकचालकांना गेल्या ७ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. शासनाने येत्या अर्थसंकल्पात त्यासाठीची तरतूद करावी यासह विविध मागण्यासाठी अर्थसंकल्पी अधिवेशनात ५ मार्च रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या आपले सरकारच्या माध्यमातून डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याचे काम हे संगणकचालक करीत आहेत. त्यांच्यामुळे राज्य शासनाला केंद्र शासनाचा ई-पंचायतमध्ये सलग ३ वर्षे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. ग्रामपंचायतीचे सर्व लेखे ऑनलाइन करणाऱ्या व गावातील नागरिकांना विविध सेवा गावातच देणाऱ्या या संगणकचालकांना गेल्या ७ महिन्यांपासून मानधन मिळत नाही. १४ व्या वित्त आयोगाचा निधी विकासकामांसाठी असून, त्यातून आपले सरकार सेवा केंद्रासाठी यामधून निधी देणार नसल्याची भूमिका ग्रामपंचायतीनी घेतली आहे. त्यामुळे चालकांना ७ महिने ते १ वर्षापर्यंत मानधन मिळत नाही. यापूर्वी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर हजारो संगणकचालकांनी मोर्चा काढला होता. मागण्या मान्य न केल्यामुळे ८ दिवस आंदोलन केले होते. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी संग्राम प्रकल्पातील सर्व संगणकचालकांना आपले सरकार सेवा केंद्रात घेण्यात येईल व निश्चित मानधन वेळेवर देण्यात येईल, असे आश्वान दिले होते. या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (संग्राम) प्रकल्पातील संगणकचालकांच्या संघटनेच्या वतीने अर्थसंकल्पी अधिवेशनात ५ मार्च रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT