पुणे ः शेतीतील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) भर देण्यात येणार आहे. यंदा पुणे जिल्ह्यात आत्मा योजनांच्या अंमलबजावणीसाठी तीन कोटी ८७ लाख ८ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे, अशी माहिती आत्मा विभागातील सूत्रांनी दिली.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) योजनांच्या अंमलबजावणीसाठी चार कोटी ३६ लाख ९३ हजार रुपयांचा आर्थिक आराखडा एप्रिल महिन्यात प्रस्तावित केला होता. त्यानंतर मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य समितीमार्फत केंद्र शासनाला पाठविला होता. केंद्र शासनाने हा प्रस्तावित आराखड्यात तरतूद केलेला निधी कमी करून तीन कोटी ८७ लाख ८ हजार रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या निधीतून शेतीविषयक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेसाठी तीन कोटी ५९ लाख ७ हजार रुपयांचा आर्थिक आराखडा प्रस्तावित केला होता. यंदा त्यामध्ये ७७ लाख ८६ हजार रुपयांची वाढ केली असून, चार कोटी ३६ लाख ९३ हजार रुपयांचा आर्थिक आराखडा प्रस्तावित केला. मात्र, गेल्या वर्षी मार्च २०१८ अखेर दोन कोटी ३८ लाख २६ हजार रुपये खर्च झाले होते. उर्वरित निधी चालू वर्षी खर्च करण्यात येत आहे. चालू वर्षी मंजूर केलेल्या आराखड्यातील निधीत केंद्र हिस्सा ६० टक्के, राज्य हिस्सा ४० टक्के आहे.
यासाठी निधी होणार खर्च
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.