मुख्य बातम्या

कृत्रिम पावसासाठी पाच वेळा बीजारोपण

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाड्यात शासनाने कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू केले. ११ ऑगस्टला औरंगाबाद जिल्ह्यात १५ किलोमीटरवर तसेच जालना जिल्ह्याच्या काही भागांत ढगांवर बीजारोपण करण्यात आले. २० ऑगस्टला जालना जिल्ह्यात चार ठिकाणी आणि २१ ऑगस्टला जालना व अहमदनगर जिल्ह्यात १९ ठिकाणच्या ढगांवर बीजारोपण केले. त्यासाठी ३८ फ्लेअर्सचा वापर करण्यात आला.  २२ ऑगस्टला पुन्हा जालना, परभणी व बीड जिल्ह्यातील १४ ठिकाणी बीजारोपण झाले. शुक्रवारी (ता. २३) परभणी जिल्ह्याच्या दिशेने प्रयोगाची दिशा निश्‍चित करण्यात आली होती. पावसाने कमालीची ओढ दिलेल्या दुष्काळी मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असल्याचे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. आयएमडीचे शास्त्रज्ञ व प्रशासनातील अधिकाऱ्यांची ८ ऑगस्टला संयुक्‍त पत्रकार परिषद औरंगाबादच्या विभागीय आयुक्‍तालयात घेऊन ९ ऑगस्टपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचणी मराठवाड्यात सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. दररोज सकाळी हवामान शास्त्रज्ञ प्रयोगासाठीची विदेशी यंत्रणा आदींची संयुक्‍त बैठक, त्या दिवशीच्या पावसायोग्य ढगांचा अंदाज, त्यानुसार कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठीचे विमानाचे त्या ढगांच्या दिशेने कुच करेल असे सांगण्यात आले.  ठरल्यानुसार दुसऱ्याच दिवशी कृत्रिम पावसासाठीच्या विमानाने ९ ऑगस्टला आकाशात झेप घेतली. परंतू ढगांवर बीजारोपण न करताच विमान परतले. ११ ऑगस्टला औरंगाबाद जिल्ह्याच्या दक्षिणेस आकाशात १५ किलोमीटर अंतरावर तसेच जालना जिल्ह्याच्या भागांत ढगांवर बीजारोपण करण्यात आले. त्यानंतर प्रयोग रखडला तो १९ ऑगस्टपर्यंत. चाचणीसाठी जे विमान आले ते प्रयोगांतर्गत विमान नाही, जे विमान प्रयोगासाठी ते विदेशातच असल्याची माहिती रखडलेल्या काळात पुढे आली. हो नाही म्हणत, विमान औरंगाबादेत दाखल झाले. परंतू पुन्हा विमान डीजीसी क्‍लीअरन्सअभावी उडाण घेऊ शकले नाही. २० ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास सोलापूरहून फ्लेअर्स घेऊन आलेल्या विमानाने रडारने दिलेल्या माहितीच्या आधारे आकाशात झेप घेऊन जालना जिल्ह्यात जवळपास चार ठिकाणी ढगांवरती बिजारोपण केले. २१ ऑगस्टला मात्र जालना व अहमदनगर जिल्ह्यात पावसायोग्य ढग असल्याची माहिती पुढे आल्याने उडान घेणाऱ्या विमानाने जवळपास १९ ठिकाणच्या ढगांवर बीजारोपण केले. त्यासाठी ३८ फ्लेअर्सचा वापर करण्यात आला. २२ ऑगस्टला पुन्हा जालना, परभणी व बीड जिल्ह्यातील १४ ठिकाणी आकाशातील ढगांवर बीजारोपण करण्यात आले. प्रयोगाच्या सुरवातीला दिलेल्या माहितीनुसार एका ढगांवर किमान एक किंवा दोन फ्लेअर्सचा वापर कृत्रिम पावसासाठीच्या प्रयोगात केला जातो. प्रयोगासाठीची चाचणी घेण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत हा प्रयोग सप्टेंबर अखेरपर्यंत व आवश्‍यकता वाटल्यास त्यापुढे पंधरवडा असे स्पष्ट करण्यात आले होते.  नेमका किती पाऊस पडला? मराठवाड्यात परतीचा पाऊस अधिक पडतो, पावसाने तशी कृपा करण्याचे संकेत दिल्यास प्रयोग सुरू राहील की गुंडाळला जाईल, हा प्रश्नही आहेच. आषाढ महिन्यात अतिघन ढग असतात. तसे मराठवाड्यात होतेही, परंतु पाऊस पडत नव्हता. मग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याअखेर सुरू झालेला कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू करण्याला उशीर झाला का, हा प्रश्नही यानिमित्ताने पुढे येतो आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाअंती नेमका कोणत्या भागात किती प्रमाणात पाऊस झाला हे अजून स्पष्ट होणे बाकी आहे हे विशेष.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT