अकोला ः सिंचनासाठी पाणी कमी झाल्याने फळबागा कशा टिकवायच्या हा पेच तयार झाला अाहे.
अकोला ः सिंचनासाठी पाणी कमी झाल्याने फळबागा कशा टिकवायच्या हा पेच तयार झाला अाहे. 
मुख्य बातम्या

फेब्रुवारीतच पाणीटंचाईची तीव्रता वाढली

टीम अॅग्रोवन

अकोला  ः या वर्षात कमी झालेल्या पावसामुळे प्रकल्प भरले नाहीत. नदी-नालेही न वािहल्याने जमिनीत पाणी जिरले नाही. याचा परिणाम या वर्षी जानेवारीपासून दिसून येत अाहे. असंख्य विहिरींनी तळ गाठल्याने सिंचनाची कामे टप्प्याटप्प्याने करावी लागत अाहेत. यामुळे येत्या काळात उन्हाळी पिकांची लागवड घटण्याची शक्यता निर्माण झाली असून, फेब्रुवारीतच पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे.   वऱ्हाडात अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत सातत्याने पावसाचे प्रमाण कमी होत चालले अाहे. या वर्षी सरासरी ८० टक्क्यांच्या अात पाऊस झाला. पडलेला पाऊससुद्धा खंड स्वरुपात होता. सलग पावसाअभावी नदी-नाल्यांना पूर वाहले नाहीत. त्यामुळे प्रकल्पही भरू शकलेले नाहीत. जमिनीतील पातळी दीड ते अडीच मीटरपर्यंत घटल्याचे सांगितले जाते.

पाणीपातळी घटल्याने विहिरींनी तळ गाठला. काही भागात विहिरींचे सिंचन कमी झाले. रब्बी हंगाम निघाला मात्र जे शेतकरी उन्हाळी पिके घेत असायचे त्यांच्या समोर पेच अाहे. पाण्याची घटलेली पातळी आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे पिकांचा ताळमेळ चुकत अाहे. पूर्वी मुबलक पाणी असलेल्या शेतकऱ्यांकडे सध्या पाण्याची समस्या वाढली. पाणीपुरवठा योजनासुद्धा प्रभावित झाल्या अाहेत.

संग्रामपूर तालुक्यात खारपाणपट्ट्यात पाण्याची पातळी खालावत आहे. यंदा तर कांदा पीक घेता येईल इतकेही पाणी राहिलेले नाही. जमिनीत पाण्याची पातळी खोल गेल्याने रब्बीसह खरिपात कपाशी लागवड क्षेत्र अल्प राहील अशी स्थिती अाहे. - संतोष राजनकर, शेतकरी संग्रामपूर जि. बुलडाणा

पाण्याची पातळी खोल गेल्याने अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार अाहे. मी दरवर्षी करार पद्धतीने अाजूबाजूच्या शेतकऱ्यांचे शेत करीत होतो. पण सध्याची पाण्याची परिस्थिती पाहता या वर्षी ते करणे शक्य दिसत नाही. माझी सध्या तीन एकर केळी व दोन एकर पानपिंपरी आहे. पाणी समस्येमुळे ही पिके जगविणे जििकरीचे झाले अाहे. - पंकज धर्मे, शेतकरी, बोर्डी जि. अकोला

नववर्षांचे स्वागतच पाणीटंचाईने झाले आहे. सध्या लहान मोठ्यांना पाण्यासाठी शिवारांमध्ये भटकावे लागत आहे. पुढील पाच महिने पाणीटंचाई भीषण होणार आहे. शासनाने तत्काळ गावामध्ये पाणी निवारणार्थ उपाययोजना करण्याची गरज अाहे. - परशराम चोपडे, ग्रामस्थ, भरजहाँगीर, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT