गिरणा, हतनूरच्या आवर्तनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
गिरणा, हतनूरच्या आवर्तनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा 
मुख्य बातम्या

गिरणा, हतनूरच्या आवर्तनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

जळगाव : जिल्ह्यातील अनेक गावांतील शेती, पिण्याच्या पाण्यासाठी आधार असलेल्या गिरणा, हतनूर धरणातून मार्चच्या पहिल्याच आठवड्यात नदीत पाणी सोडले जावे, अशी मागणी गावांमधील सरपंच, ग्रामस्थांची आहे. 

गिरणा धरणाचे पाणी मागील १५ जानेवारी रोजी नदीत सोडण्यात आले होते. तापी नदीतून पाणीच सोडलेले नाही. गिरणातून रब्बीसाठी एकदाच आवर्तन सुटले. जानेवारीत गिरणा नदीत सोडलेले पाणी आटले आहे. नदी कोरडी पडू लागली आहे. केवळ मोठ्या खड्ड्यात  पाणी साचून राहिले आहे. तापी नदीतही मोठे डोह आटले आहेत. त्यात जळगाव तालुक्‍यातील भोकर, सावखेडा खुर्दनजीकचे सर्व डोह आटल्याने उन्हाळ्यात समस्या निर्माण होऊ शकते, अशी माहिती मिळाली.

गिरणा नदीच्या पाण्यावर लिंबू, केळीच्या बागांसह रब्बी हंगामाला लाभ मिळेल. कारण नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण होईल. जिल्ह्यातील चाळीसगावसह पाचोरा, भडगाव, जळगाव, धरणगाव, भुसावळ, यावल, चोपडामधील अनेक गावांचा पाणी प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. गिरणा धरणातून नदीत पिण्याच्या पाण्यासाठी प्रथम ५ नोव्हेंबर, २०१८ ला पहिले आवर्तन सोडण्यात आले. तापी नदीतून शेतीसाठी पाण्याची मागणी यावल, रावेरातील शेतकरी, लोकप्रतिनिधींनी केली. परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.

वाघूर धरणातूनही भुसावळ भागात पाणी सोडण्याची, पाटचारी वाढविण्याची मागणी केली जात आहे. परंतु प्रशासन उद्योग व शहरांच्या पाण्याला अधिक महत्त्व देत आहे. गिरणा धरणावर मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा व भडगावच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण आहे. वाघूरमध्ये जामनेर व जळगाव शहराला पाणीपुरवठा करावा लागतो. हतनूरवर जळगावमधील औद्योगिक वसाहत, भुसावळ शहर व काही स्थानिक उद्योगांना पाणी द्यावे लागत आहे. हे पाणी कमी पडू नये, यासाठी नदीत आवर्तन सोडण्यास प्रशासन विलंब करीत आहे, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT