पेंच धरणातील पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आज मोर्चा
पेंच धरणातील पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आज मोर्चा 
मुख्य बातम्या

पेंच धरणातील पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आज मोर्चा

टीम अॅग्रोवन

नागपूर  ः पेंच धरणातील पाण्यावर पहिला हक्‍क शेतकऱ्यांचा आहे. हे पाणी सिंचनाकरिता उपलब्ध न करून दिल्यास रामटेक तालुक्‍यातील शेतकरी शुक्रवारी (ता. ७) सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देतील, अशी माहिती किसान कृती बचाव समितीचे संयोजक तुळशीराम कोठेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  सिंचनाकरिता पेंचचे पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. त्यामुळे मध्यप्रदेश व महाराष्ट्र सरकार यांच्यात चौराई धरण करारात बदलाची गरज आहे. पेंच धरणातील पाणी प्रथम शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. नागपूर महापालिकेने पेंचच्या पाण्यावर अवलंबून न राहता पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी. जलसिंचन विभागाने जाहीर सूचना देऊन उपलब्धतेप्रमाणे पाणी खरीप व रब्बी पिकासाठी द्यावे. कालव्याने सिंचन योग्यरितीने होत नसल्याने त्यात बदल करावा. कृषिपंपाचे विंधन विहिरीवरील नवीन वीज जोडणीकरिता ऊर्जा विभागाच्या अटी शिथिल करण्यात याव्या. सिंचन व्यवस्थापन न झाल्यास सिंचन विभागाने प्रतिहेक्‍टर २५ हजार रुपयांचे  अनुदान मंजूर करावे. कन्हान नदीतून बीड, चिचघाट, सिहोरा, बाबदेव, मौदा उपसा सिंचन प्रकल्प २०१९ या वर्षात पूर्ण करावा. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर माफक दरात खरीप हंगामातील निविष्ठांची उपलब्धता करावी. मनरेगाअंतर्गत शेती मशागतीची कामे व्हावी, यांसह इतर मागण्यांची पूर्तता करावी, असे त्यांनी सांगितले.  याविरोधात शुक्रवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. या वेळी रामटेक बाजार समितीचे प्रशासक अनिल कोल्हे, प्रहारचे रामटेक विधानसभा संयोजक रमेश कारामोरे, राजेश ठाकरे, नत्थु रामेलवार आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT