केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७ चा ‘भारत बंद’ यशस्वी करा : शेतकरी कामगार पक्ष
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७ चा ‘भारत बंद’ यशस्वी करा : शेतकरी कामगार पक्ष 
मुख्य बातम्या

केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७ चा ‘भारत बंद’ यशस्वी करा : शेतकरी कामगार पक्ष

वृत्तसेवा

कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, हमीभाव कायदा करावा, यासह अन्य मागण्यांसाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तर्फे २७ सप्टेंबरला पुकारलेले ‘भारत बंद’ यशस्वी करण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत करण्यात आले. माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, ‘‘शेतकरी व सर्वसामान्य जनता व प्रश्‍नावर आंदोलन होत आहे. सर्व घटकांचा आंदोलनात सहभाग वाढावा यासाठी तालुकावार मेळावा घेऊन ‘बंद’ची भूमिका पटवून देत आहोत.’’ नामदेव गावडे म्हणाले, की मोदी सरकारच्या काळात उद्योजक धार्जिणी धोरणे राबवली यातून उद्योजकांचे भले होत आहे. २७ सप्टेंबरला बिंदू चौकातून सकाळी ११ वाजता मोटरसायकल रॅली काढून व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येईल. तसेच तालुक्यातही बंदचे आवाहन करण्याचे  बैठकीत ठरविण्यात आले. बैठकीत प्रा. जालंदर पाटील, चंद्रकांत यादव, दिलीप पवार वसंतराव पाटील रवी जाधव आदी सहकार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT