पीकविमा भरण्याबाबत खानदेशातील शेतकरी उदासीन
पीकविमा भरण्याबाबत खानदेशातील शेतकरी उदासीन 
मुख्य बातम्या

पीकविमा भरण्याबाबत खानदेशात शेतकरी उदासीन

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात सुमारे ३१ हजार शेतकरी खरीप पीकविमा योजनेत सहभागापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांचे विमा हप्ते सर्व्हर डाउन, बॅंकांची टाळाटाळ यामुळे भरता आले नाहीत. ऑफलाइन कामकाज सुरू होते, परंतु शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून आली.

खानदेशातील सुमारे चार लाख कर्जदार शेतकऱ्यांचे विमा हप्ते संबंधित बॅंकांनी कापून घेतले आहेत. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागले. मागील दोन दिवसांपासून ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची सवलत दिली आहे. परंतु प्रतिसाद फारसा लाभलेला नाही. ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्र, शहरांमधील महाऑनलाइन केंद्रातही सर्व्हर डाउनची समस्या मागील आठवड्यापासून कायम आहे.

बॅंकांना कर्जदार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. यामुळे बॅंकांनी किती कर्जदार शेतकऱ्यांचे विमा हप्ते कापून ते विमा कंपनीकडे सादर केले, याची नेमकी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी विभागाकडे मंगळवारी (ता. ३१) उपलब्ध नव्हती. जळगाव जिल्ह्यातील सुमारे ६ हजार, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात प्रतेकी सुमारे ४ हजार बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला.

जळगाव जिल्ह्यात जवळपास १४ हजार, धुळ्यात १० हजार आणि नंदुरबारात सुमारे ६ हजार बिगर शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. कृषी विभाग सकाळपासून किती शेतकरी सहभागी झाले याची माहिती मिळविण्यात व्यस्त होता. स्वतंत्र कर्मचारी त्यासंबंधी नियुक्त केले; परंतु विमा कंपनी व बॅंकांकडून नेमकी माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT