karjmafi
karjmafi 
मुख्य बातम्या

परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी कर्जमाफीपासून वंचित 

टीम अॅग्रोवन

दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने विश्वासात न घेता परस्पर पिककर्जाचे पुर्नगठन केल्याने ३० ते ३५ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीपासून वंचित राहावे लागले आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांना पीक कर्जाचे परस्पर पुनर्गठन झाल्याबाबत सखोल चौकशी करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. मात्र यावर कुठलीही हालचाल झालेली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.  याबाबत तेल्हारा येथील सहायक निबंधकांना शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, सन २०१६ ते २०१९ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जाचे विश्वासात न घेता सेवा सहकारी संस्थेने परस्पर पुनर्गठन केले. या पुनर्गठनामुळे तुटपुंज्या स्वरूपात कर्जमाफी झाली आहे. याबाबत सचिवांना विचारले असता समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. काही लोकांचे संमतिपत्र दाखवले परंतु त्यावरील स्वाक्षऱ्या खऱ्या नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकाच वेळेस सभासदांनी कर्ज काढले होते. काही सभासदांना संपूर्ण कर्जमाफी झाली. काहींचे पुनर्गठनामुळे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित रहावे लागले आहे.  या संपूर्ण प्रकरणावरून सेवा सहकारी संस्थेने मनमानी करून जाणीव पूर्वक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवून आर्थिकदृष्ट्या नुकसान केले जात आहे. दरवर्षीची नापिकी, गारपीट यामुळे हलाखीची परिस्थिती बनलेली आहे. त्यातच आता हा अन्याय झालेला आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी कमला शालीग्राम हागे प्रमिला वासुदेव पिंजरकर, गोकूळा मनोहर फोकमारे वसंता चवंडकार, भगवान ढगे, रमेश गळसकार, प्रकाश कूले, शालीग्राम हागे, गंगाधर झगडे, भिकाजी हागे, देवेंद्र सिंह सिसोदिया, सै.अयूब सै.याकूब व शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT