शेतीसाठी ‘वाण’चे पाणी देण्याची संग्रामपुरातील शेतकऱ्यांची मागणी
शेतीसाठी ‘वाण’चे पाणी देण्याची संग्रामपुरातील शेतकऱ्यांची मागणी 
मुख्य बातम्या

शेतीसाठी ‘वाण’चे पाणी देण्याची संग्रामपुरातील शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन

अमरावती : वाण नदी प्रकल्पातील पाणी संग्रामपूर (बुलडाणा) तालुक्‍यातील लाभ क्षेत्रात असलेल्या सर्व गावांना पाइपद्वारे शेतीकामी पाणी मिळावे, अशी मागणी वरवट बकाल येथील शेतकऱ्यांनी केली. संग्रामपूर तहसीलदारांना या संदर्भाने निवेदन देण्यात आले. 

निवेदनानुसार, वाण नदी प्रकल्पात सद्यःस्थितीत पाण्याची उपलब्धता आहे. पिकांची पाण्याची गरज लक्षात घेता सरकारच्या महत्त्वाकांक्षी पाइप सिंचन योजनेद्वारे हे पाणी शेतीकामी देण्यात यावे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यांना त्वरित कर्जमाफीचा लाभ मिळावा. त्यासोबतच येत्या खरीप हंगामासाठी नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय व्हावा.

संग्रामपूर तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्या संदर्भाने असलेल्या उपाययोजनांचा लाभदेखील मिळावा, अशी मागणी आहे. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा इशारादेखील शेतकऱ्यांनी दिला. निवेदनकर्त्यांमध्ये मंगेश ढगे, विक्रम पाटील, आकाश बकाल, नंदकिशोर बकाल, दिनेश बकाल, संतोष टाकळकार, बाबुलाल दहिकर यांच्यासह इतर शेतकऱ्यांचा समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT