शेतकरी, ग्राहकांनी  कृषी कायद्यांना विरोध करावा Farmers, consumers Oppose agricultural laws
शेतकरी, ग्राहकांनी  कृषी कायद्यांना विरोध करावा Farmers, consumers Oppose agricultural laws 
मुख्य बातम्या

शेतकरी, ग्राहकांनी  कृषी कायद्यांना विरोध करावा 

टीम अॅग्रोवन

कागल, जि. कोल्हापूर : नव्या कृषी कायद्यांमुळे शेतीमाल उद्योगपतींना विकावा लागणार आहे. त्यामुळे बाजारात उद्योगपतींची मक्तेदारी निर्माण होईल. याचा फटका शेतकऱ्यांना व ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांनी जागृत होऊन या नव्या कायद्याला विरोध करावा, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.  संघटनेच्या वतीने येथील गाताडे मळ्यात प्रबोधनात्मक शेतकरी शिबिर झाले. यावेळी शेट्टी बोलत होते. कृषी विषयक कायद्यांचे शेतकरी, शेती, ग्राहक यावर होणारे अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम या बाबत या शिबिरात चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी होते.  शेट्टी म्हणाले, ‘‘दिल्लीत कडाक्‍याच्या थंडीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ४६ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांनी नवीन कायदे समजून घेणे आवश्‍यक आहे. हमीभावाच्या जबाबदारीतून सरकारला मुक्त व्हायचे आहे. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर आहे ते कायदे कडक करा. नव्या कायद्यामुळे जमिनी अडकून शेतकऱ्यांचा बळी जाणार आहे. शेतकऱ्यांचे सर्वात मोठे गिऱ्हाईक सरकार आहे. त्यातून राहिलेले धान्य बाजारपेठेत विकले जाते. नव्या कायद्यानंतर काही दिवस बाजार समितीच्या बाहेर चांगले भाव मिळतील. त्यानंतर व्यापाऱ्यांची मक्तेदारी सुरू होऊन शेतकरी गुलाम बनेल. सरकार बाजार समित्या संपवून टाकणार आहे. शासनाची अन्नधान्य गोडावून अदानी, अंबानी हे कवडीमोल भावाने खरेदी करतील. हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करता येणार नाही, असा कायदा सरकारने करावा.’’  स्वागत राजेंद्र बागल व प्रास्ताविक सागर कोंडेकर यांनी केले. अशोक शिरोळे, प्रताप ऊर्फ भैय्या माने, उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, विलास गाताडे, आनंदा पसारे, सतीश घाडगे, बाबासो नाईक, विवेक लोटे, राजू माने, योगेश गाताडे उपस्थित होते. नितीन कोगनोळे यांनी आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT