शेतकरी कंपन्यांकडून फळे, भाजीपाला पॅकिंग, विक्री
शेतकरी कंपन्यांकडून फळे, भाजीपाला पॅकिंग, विक्री 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात शेतकरी कंपन्यांकडून फळे, भाजीपाला पॅकिंग, विक्री

टीम अॅग्रोवन

सातारा : शेतकरी ते ग्राहक या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात ११ शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कंपन्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शेतकरी एकत्र आले आहेत, त्यामुळे ग्राहकांना रास्त दरात शेतीमाल, तर शेतकऱ्यांच्या शेतीमालास वाजवी किंमत मिळण्यास मदत होऊ लागली आहे. शासनाने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यात २०१३ मध्ये शेतकरी कंपन्या स्थापन करण्यास सुरवात झाली. तीन वर्षांत शेतकरी कंपन्या स्थापन करून त्या सक्षम करण्यासाठी शासनामार्फत आर्थिक मदत केली जाणार आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ११ शेतकरी कंपन्याची स्थापना करण्यात आली आहे. तत्कालीन कृषी पणन तज्ज्ञ सायली महाडीक यांनी कंपन्या स्थापनेसाठी विशेष प्रयत्न केले होते. यामधील तीन शेतकरी कंपन्या चांगल्या प्रमाणात काम सुरू झाले असून, उर्वरित कंपन्याची गती येण्यासाठी आत्मा व एमएसीपीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या कंपन्याच्या व्यवसाय वृद्धीसाठी प्रत्येक वर्षी खरेदीदार विक्रेता संमेलनाचे अयोजन करण्यात येते. यातून अनेक करार झाल्यामुळे कंपन्यांना गती येण्यास मदत झाली आहे. केडंबे येथील वेण्णा वॅली शेतकरी कंपनीकडून स्ट्रॉबेरीची प्रतवारी, पॅकिंग करून थेट विक्री केली जात आहे. फंरादवाडी येथील कृषी क्रांती या शेतकरी कंपन्याकडून धान्याची प्रतवारी तर गिरवी येथील गोपल कृष्ण शेतकरी कंपनी डांळिब विक्री व भाजीपाला पॅकिंग करून विक्री केली जात आहे. उर्वरित कंपन्यांनी गती घेणे गरजेचे ११ पैकी तीन कंपन्यांना अग्रेसर झाल्या आहेत. कंपन्याच्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणात संघटित होत आहेत. या संघटित शेतकऱ्यांना दिशा देण्यासाठी सर्वच कंपन्यांच्या संचालक तसेच कृषी विभागाकडून अग्रेसर होण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT