शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा पीकविमा
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा पीकविमा 
मुख्य बातम्या

शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा पीकविमा

Raj Chougule

वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे वंचित राहावे लागलेल्या तालुक्‍यातील १४४ पीक कर्जदार आंबा उत्पादक शेतकऱ्यांना झाराप (ता. कुडाळ) येथील भावई शेतकरी मंडळाच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे तब्बल ९० लाख रुपये नुकसान भरपाईपोटी मिळाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनाशी या प्रश्‍नी सुरू असलेला झगडा संघटित शक्तीमुळे यशस्वी झाला आहे. 

एखाद्या शेतकरी मंडळाच्या सलग पाठपुराव्यामुळे इतकी मोठी रक्कम मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. मंडळाचे अध्यक्ष संजय सामंत यांच्यासह त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी अखंड परिश्रम घेऊन ही रक्कम शेतकऱ्यांना मिळवून दिली आहे.  

किंमत समर्थन योजनेअंतर्गत राज्यामध्ये नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघातर्फे हमीभावाने हरभरा खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी पोर्टलची लिंक मिळत नसल्यामुळे नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे अद्याप नोंदणी सुरू न झालेल्या केंद्रांवर हरभरा खरेदी उशिराने सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बाजारपेठेत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली असून, प्रतिक्विंटलचे दर चार हजार रुपयांपेक्षा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हमीभाव केंद्रावर तत्काळ हरभरा खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

हवामानाधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत बॅंकांनी शेतकऱ्यांकडून घेतलेला विमा हप्ता विमा कंपनीकडे विहीत कालावधीत भरणे आवश्‍यक असते; परंतु वेंगुर्ल्यातील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेतील तत्कालीन शाखाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आंबा उत्पादकांनी भरलेला हा हप्ता कंपनीकडे भरलाच गेला नाही. हप्ता भरल्यानंतर दीड महिन्यानंतर याबाबतची कार्यवाही होणे अपेक्षित असते. परंतु विम्याबाबत काहीच भाष्य न झाल्याने काही शेतकऱ्यांनी बॅंकेकडे विचारणा केली. परंतु त्यांना योग्य उत्तरे देण्यात आली नाहीत. बॅंक प्रशासनाच्या चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी हप्त्याची रक्कम परत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून विम्याचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले. 

याबाबतची तक्रार आवेरा या गावातील शेतकऱ्यांनी मंडळाकडे केली व मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली. बॅंक चूक लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच मंडळाचे अध्यक्ष श्री. सामंत यांनी हे काम मिशन म्हणून हातात घेतले. यासाठी सातत्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे घातले. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. जिल्हा प्रशासनाने त्यांना बॅंकिंग लोकपालाकडे याबाबतची तक्रार करण्यास सांगितले. श्री. सामंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिद्द कायम ठेवली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापर्यंत विषय पोचविला. मुंबईतील अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधला.

पंतप्रधान कार्यालयापर्यंत संपर्क ठेवला. अनेक अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन अन्याय झाल्याची भावना संबंधितांपर्यंत पोचविली. किचकट तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्या. अखेर या धडपडीची दखल घेत वरिष्ठ पातळीवरून बॅंकेला याबाबतची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना स्वनिधीतून देण्याचे आदेश देण्यात आले. जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांना या प्रश्‍नी दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचेही आदेश दिले. बॅंकेने तातडीने हालचाली करताना संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांवर ९० लाख रुपये जमा केले आहेत. किचकट असलेला हा लढा या शेतकरी मंडळाने निर्धाराने सुमारे सहा महिने लढून यशस्वी करून दाखविला आहे. श्री. सामंत यांच्याबरोबरच कमलाकांत देसाई, रमेश पटवर्धन, नितीन कुडाळकर यांनी मंडळामार्फत परिश्रम घेतले; तर कर्जदार शेतकरी अशोक चव्हाण, अविनाश दुतोंडकर, सुनील नाईक, समीर केळुसकर, भिकाजी गावडे, दाजी नाईक, राजू वाडेकर आदींनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी एकीची मूठ बांधत ही नुकसान भरपाई मिळविली.

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे लक्षात येताच आम्ही लढा तीव्र केला. एकीकडे तांत्रिक बाबी प्रशासनापुढे आणल्याच, त्याचबरोबर आंदोलनाचाही इशारा देऊन हक्काची रक्कम मिळावी यासाठी लढा तीव्र केला. तो यशस्वी झाल्याचे समाधान नक्कीच आम्हाला आहे.  - संजय सामंत, अध्यक्ष, भावई शेतकरी मंडळ, झाराप

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT