कानगाव, जि. पुणे ः येथे राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाची मशाल पेटविताना ग्रामस्थ.
कानगाव, जि. पुणे ः येथे राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाची मशाल पेटविताना ग्रामस्थ. 
मुख्य बातम्या

कानगावमध्ये अाक्रोश अांदोलन, संपाला सुरवात

अमर परदेशी
वरवंड, जि. पुणे ः शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह इतर मागण्यांना सरकारने गुंगारा दिल्याने दौंड तालुक्यातील कानगाव येथे गुरुवारी (ता.२) अखेर राज्यव्यापी आक्रोश आंदोलन व शेतकरी संपाची ठिणगी पडली. 
 
सकाळी शेतकरी, महिला, मुले, ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन आक्रोश आंदोलनाची मशाल पेटवून प्रभात फेरी काढली. देवीच्या मंदिरातील गाभारा व कळसावर दूध ओतून अभिषेक केला. या वेळी सरकारला शेतकरीहिताच्या धोरणाची सतबुद्धी देवो, अशी जोरदार मागणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या नियोजित मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत गावात वेगवेगळ्या पद्धतीने चक्री आंदोलन व संप सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी बोलून दाखविला.
 
सरकाने शेतीविरोधी धोरणांचा सापाटा लावल्याने बळिराजा आर्थिक संकटाच्या खाईत आहे. त्यातच सरकाने दिशाभूल करणाऱ्या कर्जमाफीचे गाजर दाखविले असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य किसान मोर्चाचे समन्यवक व शेतकरी कामगार पक्षाचे नेते शांताराम कुंजीर यांनी २ नाव्हेंबरपासून राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाची घोषणा केली होती.
 
त्यानुसार कानगावमध्ये आंदोलन व संप करण्यात अाला. या वेळी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन ‘शेतमाल आमच्या घामाचा नाही कोणाच्या बापाचा’ आदी घोषणांनी शिवार दणाणून सोडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT