अकोला जिल्ह्यात शेतकरी अपघात विम्याचा लाभ ५० टक्केही नाही
अकोला जिल्ह्यात शेतकरी अपघात विम्याचा लाभ ५० टक्केही नाही  
मुख्य बातम्या

अकोला : शेतकरी अपघात विम्याचा लाभ ५० टक्केही नाही

टीम अॅग्रोवन

अकोला : शेतकऱ्याला झालेल्या अपघातानंतर कुटुंबाची वाताहत होते. अशा कठीण प्रसंगात या कुटुंबाला आधार मिळावा या उद्देशाने सुरू केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा जिल्ह्यात प्रत्यक्ष लाभ मिळण्याचे प्रमाण ५० टक्केही नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात १६९ प्रस्ताव सादर झाले. त्यापैकी केवळ ६७ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.  शेतकऱ्याला कुठलाही अपघात झाल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाची वाताहत होते. अशा प्रसंगात या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कुटुंबांकडून अर्जही केले जातात. परंतु लाभ मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांचा याकडे ओढा कमी होऊ लागला आहे. 

जिल्ह्यात सन २०१८-१९ या वर्षात ५३ अर्ज दाखल झाले. कृषी विभागाने हे सर्व प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर केले. यापैकी केवळ १२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. कंपनीने १२ प्रस्ताव नामंजूर केले. १६ प्रस्तावांत त्रुटी निघाल्या. सध्या कंपनीकडे १३ प्रस्ताव आहेत. मागील तीन वर्षांत कंपनीकडे १६९ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ ६७ प्रस्ताव विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आले आहेत. ४६ प्रस्ताव नामंजूर झाले. तसेच अद्याप ४० प्रस्ताव कंपनीस्तरावर आहेत. 

अकोला जिल्ह्यातील विमा प्रस्तावांची स्थिती...
वर्ष प्राप्त प्रस्ताव कंपनीस सादर मंजूर नामंजूर शेतकरी स्तरावर कंपनीकडे
२०१६-१७ ५१ ५१ २९ १८
२०१७-१८ ६५ ६५ २६ १६ २३
२०१८-१९ ५३ ५३ १२ १२ १६ १३
एकूण १६९ १६९ ६७ ४६ १६ ४०

विमा संरक्षण समाविष्‍ट असलेले अपघात रस्ता, रेल्वे, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, खून, उंचावरून पडून मृत्यू, नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यू, दंगल इत्‍यादींमुळे होणाऱ्या अपघाती घटनांमुळे शेतकऱ्यास मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास या विमा योजनेचा लाभ मिळू शकतो. या अपघात विमा योजनेचा १० ते ७५ वयोगटातील शेतकऱ्यांना सहभागी होता येते. अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, निर्धारित केलेल्या संपूर्ण कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकाऱ्याकडे प्रस्ताव द्यावा लागतो. कंपनीद्वारे शहानिशा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT