Dust storms came from the Gulf countries
Dust storms came from the Gulf countries 
मुख्य बातम्या

आखाती देशातून आले धुळीचे वादळ 

टीम अॅग्रोवन

पुणे : आखाती देशातून वाहणारे धुळीचे वादळ महाराष्ट्राकडे आल्याने उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात रविवारी (ता.२३) दिवसभर धुक्याचे साम्राज्य पसरले होते. अनेक ठिकाणी सकाळपासून दाट धुके असल्याने दृश्यमानता कमी झाल्याचे चित्र होते. सूर्य दर्शन झाल्याने व थंड व कोरड्या हवामानामुळे दिवसा देखील गारठा जाणवला.  दोन दिवसांपासून अरबी समुद्रावरून ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शनिवारी (ता.२२) सकाळपासूनच ढगाळ हवामान झाले होते. सायंकाळनंतर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. यातच आखाती देशा कडून येणाऱ्या कोरड्या व धुळयुक्त वाऱ्यांमुळे रविवारी उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात धुळीचे लोट उसळण्याची, त्यामुळे दृश्यमानता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती.  आखाती देशातून वाहणारे वारे अफगाणिस्तान, पाकिस्तान, राजस्थान गुजरात या भागाकडे येते. वाऱ्याचा वेग अधिक असेल व दिशा बदलली तर हे धुळीचे वारे दक्षिणेकडे येऊन त्याचा महाराष्ट्रातही प्रभाव जाणवतो, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  रविवारी (ता.२४) ठाणे, पालघर, मुंबई, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे जिल्ह्यात पहाटे पासूनच दाट धुके तसेच पिकांवर दव पडले होते. अनेक भागात सूर्यदर्शन झाले नाही. तर तर काही ठिकाणी स्वच्छ सुर्यप्रकाश मिळाला नाही. अनेक भागात दुपारनंतर जोरदार वेगाने थंड व कोरडे वारे वाहत असल्याने गारठाही वाढल्याचे जाणवत होते. आज (ता. २४) राज्याच्या किमान तापमानात घट होणार असून, अनेक भागात धुके पडण्याची शक्यता आहे. .....

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT