डाॅ. मायी
डाॅ. मायी  
मुख्य बातम्या

धोका ओळखा, तंत्रज्ञानाचा स्वीकार करा : डॉ. सी. डी. मायी

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद: लष्करी अळी आक्रमणाच्या निमित्ताने ''बायोलॉजिकल वॉर''ची शंका येते. कुणी सर्जिकल स्ट्राइक केला असला तरी धोके ओळखून तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आपण एकात्मिक प्रयत्नातून मका पिकावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळी'' या नव्या संकटाचा सामना करायला सज्ज राहायला हवे, असे मत कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्यक्ष आणि माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी यांनी व्यक्‍त केले.  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, साउथ एशिया बायोटेक्‍नॉलॉजी सेंटर नवी दिल्ली व कृषी विभाग औरंगाबाद यांच्या संयुक्‍त विद्यमाने औरंगाबाद येथील महसूल प्रबोधिनीमध्ये बुधवारी (ता. २६) ''मक्‍यावरील लष्करी अळी नियंत्रण व जागृती अभियान''ची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मायी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, ‘वनामकृवि’चे संचालक संशोधन डॉ. डी. पी. वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. पी. जी. इंगोले, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी संचालक डॉ. सैन दास, भारतीय कृषी अनुसंधान संस्थान दिल्लीचे माजी कीटकशास्त्रज्ञ विभागप्रमुख व एस. ए. बी. सी. चे शास्त्रज्ञ डॉ. जी. टी. गुजर, औरंगाबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार, औरंगाबादचे अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे, जालनाचे अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.  डॉ. मायी म्हणाले, की मक्‍यावरील लष्करी अळीच्या आक्रमनाने आता युद्ध करण्यासाठी बॉंबची गरज नाही. गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठीच्या प्रयत्नातून बरेच शिकता आले. शेतकरी सजग आहे, त्याला मक्‍यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी फक्‍त मुद्दे हवेत. अल्प माहितीतून ते मुद्दे त्यांच्यापर्यंत कसे पोचतील यासाठी त्यांच्यामध्ये जागृती होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे. त्यासाठी शेतकऱ्यांना सधन करून त्यांची ज्ञानवृद्धी करणे आवश्‍यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करताना त्याचे धोके ओळखून त्याच्या वापर निश्‍चित करावा. कोणतेही तंत्रज्ञान वापरतांना त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी.  उद्‌घाटनपर सत्राचे स्वागतपर विचार डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी मांडले. यावेळी डॉ. इंगोले, डॉ. सैन दास, डॉ. गुजर, डॉ. चौधरी, डॉ. मोटे यांनी मार्गदर्शन केल. उद्‌घाटन सत्राचे आभार डॉ. एस. बी. पवार यांनी मानले. दुसऱ्या सत्रात डॉ. पी. आर. झंवर, डॉ. बी. व्ही. भेदे, डॉ. गोविंद गुजर व डॉ. भगीरथ चौधरी, अजित चव्हाण यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेखा कदम यांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT