मुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर क्षेत्रावर (५४ टक्के) पेरणी झाली असून ९२ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. १७ जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून, सात जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. कृषिमंत्री म्हणाले, की राज्यात १२ जुलैपर्यंत ३७९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. राज्याच्या ३५५ तालुक्यांपैकी २८ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के, १३७ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के, ९८ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के आणि ९२ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र असून ८०.६१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोकण व पुणे विभागात अनुक्रमे ३६ हजार ३५५.२९ हेक्टर तर ४ हजार ९२९.०७ हेक्टर क्षेत्रावर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली आहेत. कोकण विभागात ४७ तालुक्यांपैकी २ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. कोकण विभागात ४.६१ लाख हेक्टर खरिपाच्या क्षेत्रापैकी १.१९ लाख हेक्टर (२६ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात पुणे व लातूर विभागात काही ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता आहे. ठाणे, पालघर, रायगड, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १०० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, गोंदिया आणि चंद्रपूर या १० जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. नाशिक विभागात ४० तालुक्यांपैकी ४ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, १६ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के, ११ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के तर ९ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस. कृषिमंत्री म्हणाले....
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.