नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा विषाणू देशातून गेलेला नाही. त्यामुळे लस येत नाही तोपर्यंत देशवासीयांनी कोरोनासंदर्भात आरोग्यविषयक दिशानिर्देशांचे पालन करताना हयगय करू नये, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. नवरात्रासह आगामी दसरा, ईद, दिवाळी, छटपूजा, गुरू नानक जयंती हा सणासुदीचा काळ भारतीयांच्या जीवनातही आनंद घेऊन यावा अशी मी प्रार्थना करतो. आरोग्यविषयक खबरदारी घेताना हयगय करू नका तसेच आपला व इतरांचा सणांचा आनंद हिरावून घेऊ नका, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधानांनी आज सायंकाळी देशाला संबोधित करताना सांगितले, की कोरोनाविरूध्द लढाईत जनता कर्फ्यूपासून आजतागायत भारतवासीयांनी मोठा प्रवास केला आहे. आर्थिक व इतर व्यवहारांत गती येत आहे. लोक जबाबदाऱ्या सांभाळून जीवनाला गती देण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. सणासुदीच्या काळात बाजारपेठांतही हळूहळू व्यवहार वाढत आहेत. मागील ७-८ महिन्यांत भारताने परिस्थिती जशी सांभाळली त्यात आणखी सुधारणा करणे गरजेचे आहे. भारतातील कोरोना व्यवस्थापन परिस्थिती विकसित देशांपेक्षा चांगली असल्याचे सांगताना मोदी म्हणाले, की अमेरिका, स्पेन, ब्राझील, ब्रिटन यासारख्या संपन्न देशांच्या तुलनेत भारताने जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचविण्यात यश मिळविले आहे. आमच्याकडे रिकव्हरी रेट जास्त आहे व मृत्यूदर कमी आहे. मात्र अजून ही निष्काळजीपणे वागण्याची ही वेळ नाही, असा त्यांनी इशारा दिला.
मोदी म्हणाले...
मानवजातीला वाचविण्यासाठी सारे देश काम करत आहेत. भारतासह काही देशांच्या लशींच्या चाचण्या अग्रेसर व आशादायक स्थितीत आहेत. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.