Director of ‘Gokul Sugar’ Farmers sit in front of the house
Director of ‘Gokul Sugar’ Farmers sit in front of the house 
मुख्य बातम्या

‘गोकूळ शुगर’च्या संचालकांच्या घरासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) ः येथील ‘गौकुळ शुगर’ने गेल्या वर्षीच्या गळित हंगामातील ऊस उत्पादकांना ऊसबिले अद्यापही दिली नसल्याने शेतकऱ्यांनी थेट कारखान्याचे कार्यकारी संचालक दत्ता शिंदे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले.

पैसे घेतल्याशिवाय हलणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. त्यामुळे पेच वाढला. पण, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आणि चार-पाच दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकरी माघारी फिरले. 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील ‘गोकुळ शुगर’ने गेल्या आठ महिन्यांपासून उसाचे बिल दिले नाही. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक दत्ता शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन केले. गेल्यावर्षी प्रतिटन २६०० रुपयाचा दर देण्याचे ठरले. तसेच पंधरा दिवसांत बिल अदा करू, असा शब्दही दिला. 

‘आमच्या उसाचे पैसे द्या, अन्यथा आम्ही इथेच आत्महत्या करू’ असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. दत्ता शिंदे यांचे वडील बलभीम शिंदे यांनीही आंदोलकांची समजूत काढली. पण, शेतकरी ऐकत नव्हते. उस उत्पादक शेतकरी अधिक आक्रमक झाल्याने मध्यस्थीसाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना बोलावण्यात आले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून दत्ता शिंदे यांच्याशी चर्चा केली. पाच सप्टेंबरपर्यंत ऊस बिल देण्याचा तोडगा निघाला आणि आंदोलन मागे घेण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT