agri produce
agri produce  
मुख्य बातम्या

औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री उलाढाल १० कोटींच्या उंबरठ्यावर

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीची संकल्पना पुढे आली. २९ मार्चपासून थेट विक्री आजअखेर दहा कोटींच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकावा म्हणून शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना पुढे आली. त्या आठवडे बाजारात औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास १८ ते २० शेतकरी गटांनी व काही शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत जवळपास चार वर्षांपासून शेतमाल थेट ग्राहकांना विकला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने भाजीपाला व फळांची थेट विक्री करण्याची संकल्पना पुढे आली. कृषी विभागासह आत्मा व महसूल, सहकार, पोलिस आदी विभागांच्या समन्वयातून २९ मार्चला औरंगाबाद शहरात थेट विक्री सुरू झाली. सुरुवातीला जवळपास २१ शेतकरी गट व शेतकऱ्यांनी फळे, भाजीपाल्यासह धान्याची थेट ग्राहकांना विक्री करण्याची तयारी दाखविली. आता विविध शेतकरी गट, शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी आदी मिळून जवळपास ७७ वर संख्या पोचली आहे. औरंगाबाद शहरात होत असलेली विक्री आता तालुका स्तरावर व ग्रामीण भागातील महत्त्वांच्या छोट्या मोठ्या गावांत पोचली आहे. 

ग्राहकांना मोठी विक्री थेट विक्री साखळीतून आत्तापर्यंत ६९ लाख ६९ हजार सातशे पाच किलो भाजीपाला तर ४० लाख ४५ हजार २७६ किलो फळांची औरंगाबाद जिल्ह्यातील विविध गाव व शहरातील ग्राहकांना थेट विक्री करण्यात आली आहे. या थेट फळे भाजीपाला विक्रीतून झालेली उलाढाल आजच्या घडीला ९ कोटी ९७ लाख ५४ हजार ६५५ रुपयांवर पोचली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT