In Dhule, Nandurbar, onions are now on dust
In Dhule, Nandurbar, onions are now on dust 
मुख्य बातम्या

धुळे, नंदुरबारमध्ये चाळीतील कांदा आता उकिरड्यावर

टीम अॅग्रोवन

कापडणे, जि. धुळे : उन्हाळ कांद्याच्या भावाअभावी शेतकऱ्यांचे वांधे झाले आहेत. चाळीत कांदा साठविला. भाव वाढेल या आशेने शेतकरी तिष्ठत आहेत. सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात सड झाली आहे. साठविलेल्या कांद्यापैकी ७० टक्के कांदा खराब झाला आहे. आता हा सडलेला कांदा उकिरड्यावर फेकला जात आहे. उर्वरित कांदाही मातीमोलच होणार आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

धुळे व नंदुरबारमधील शेतकऱ्यांनी लॉकडाउनमध्ये कांदा चाळीत साठविला. बाजारपेठा बंद होत्या. निर्यातबंदी होती. स्थानिक ग्राहकही नसल्याने भाव नव्हता. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठविला. किमान प्रतिक्विंटल दोन हजारांचा भाव मिळेल, या आशेने चार महिने निघून गेले. तरीही योग्य भाव मिळाला नाही.

निर्यात धोरण खुले, तरीही...

केंद्र सरकारने कांद्यावर जाचक पद्धतीने निर्यात शुल्क लावले होते. गेल्या महिन्यापासून निर्यात शुल्क काढून घेतले आहे. कांद्याला खुला बाजार उपलब्ध झाला आहे. तरीही भावात अपेक्षित सुधारणा झालेली नाही. परिसरात दोन महिन्यांपासून सातत्यपूर्ण पाऊस होत आहे. कांद्यातील सड मोठ्या प्रमाणावर वाढली. उन्हाळ कांदा ७० टक्के उकिरड्यावर फेकला गेला. उर्वरित कांद्यालाही अधिक भाव मिळण्याची अपेक्षा मावळल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

उन्हाळ कांद्याला योग्य भाव मिळाला नाही, तो सडत आहे. आता पावसाळी कांद्याचे क्षेत्र अधिक वाढले आहे. आगामी काळातही कांद्याला अधिक भाव मिळेल, याची खात्रीच नाही. शासनाने उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यायला हवा. - संभाजी पाटील, कांदा उत्पादक शेतकरी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT