अकोला ः आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळापूर तालुकाध्यक्ष शिवाजी म्हैसने यांनी जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांच्याकडे केली आहे.
याबाबत म्हैसने यांनी म्हटले की, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. आता बाजारपेठा सुरू होण्याचे संकेत प्राप्त झाले आहे. त्यातही प्रथम नोंदणी करा नंतर आपला नंबर लागेल. त्यानंतर माल विकला जाईल. नंतर पेमेंट अदा केले जातील. या सर्व प्रक्रियेत शेतकरी भरडला जाणार आहे. त्यातच शेतीच्या मशागतीकरिता मोठा खर्च लागतो. अशातच हवामान खात्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच पेरणी होईल, असा अंदाज व्यक्त केल्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस खते बी- बियाण्याची सोय लावावी लागेल. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला. मागील सरकारची कर्जमाफी चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. परंतु आताच्या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. अनेक शेतकऱ्यांची कर्जे माफ झाली, अशा शेतकऱ्यांना तसेच चालू कर्जदार शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.