चारा छावण्या सुरू करण्याची मागणी
चारा छावण्या सुरू करण्याची मागणी 
मुख्य बातम्या

चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

टीम अॅग्रोवन

पुणे  : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. आता पाणी टंचाईपाठोपाठ चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. चारा उपलब्धतेअभावी जीवपाड जपलेली जनावरे सांभाळायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. जनावरांना चारा पुरवठा करण्यासाठी पुरंदर, बारामती, दौंड तालुक्यातून चारा छावण्या सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आले आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली.

यंदा परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईसह चाऱ्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यात दहा लाखांहून अधिक जनावरे आहेत. एप्रिल २०१९ पर्यंत चारा पुरेल एवढा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु, बारामती, जुन्नर, पुरंदर आणि दौड तालुक्‍यांतील काही गावांमध्ये अात्तापासून चाऱ्याचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे या भागात जनावरांसाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना, तसेच चारा छावण्या सुरू कराव्यात, असे प्रस्ताव विविध शेतकरी संघटना, गावांकडून आले आहेत. जिल्हा परिषदेकडून हे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले.

दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना सुरू

जिल्हा परिषदेच्या टंचाई आराखड्यानुसार यंदा शिरूर तालुक्यातील पाबळ, दौंड तालुक्यातील जिरेगाव पेडवी, स्वामी चिंचाेली, बारामतीतील सुपे, मोरगाव, जळगाव, इंदापूरमधील कळस निरगुडे, जुन्नर तालुक्यातील नळावणे, आणे, आंबेगावतील वडगाव पीर, खेडमधील कन्हेरसर परिसरमध्ये चारा टंचाई भासण्याची शक्यता आहे. पुढील काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हा परिषदेने आतापासून नियोजन सुरू केले आहे, असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT