रत्नागिरी : अनिश्चित पावसाचा हंगाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. यासाठी सौर कृषिपंप योजना राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात या योजनेला प्रतिसाद नव्हता. मात्र, आता सौरपंपाना वीज पुरवठा करण्यात येणार असल्याने यासाठी शेतकऱ्यांकडून ऑॅनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. योजनेत कृषिपंपांना दिवसा कमीतकमी ४ तास वीज देण्यात येईल. त्यांना सवलतीच्या दराने वीज पुरवठा करण्यात येईल.
शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून लॉकडाऊन असताना विविध आर्थिक योजना नियोजित केल्या आहेत. सौर कृषिपंप योजनेद्वारे कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा देण्यासाठी ३३ लाखांचा निधी प्रस्तावित आहे. गेल्या २ वर्षांपासून शेती पंपासाठी नवीन वीज जोडणी देणे बंद आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीपंपासाठी कोकणातही लघुदाब वीज वाहिन्यांवरून नवीन वीज जोडण्या देण्याची योजना राबविण्यात येईल. आशियाई विकास बँकेच्या सहकार्यातून ही योजना लागू करण्यात येईल.
सौर कृषी पंप योजना पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. या योजनाद्वारे प्रतिवर्ष एक लाख ५ हजार सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. अर्थसंकल्पात या योजनेसाठी ६७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेत कृषिपंपांना दिवसा कमीतकमी ४ तास वीज देण्यात येईल. सध्या सरासरी वीजपुरवठा दर साडेसहा रुपये आहे. कृषिपंपांना १ रुपया ८८ पैसे या सवलतीच्या दराने वीज पुरवठा करण्यात येतो.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.