पीकविमा
पीकविमा 
मुख्य बातम्या

नऊ तालुक्‍यांतील शेतकरी पीकविम्यापासून वंचित

Abhijeet Dake

सांगली ः पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा, असा दिंडोरा शासनाने पिटला आहे. जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यापैकी केवळ पलूस तालुक्‍याला ७ लाख ५९ हजार रुपयांची मदत मिळाली. शासनाच्या या घोळामुळे जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांतील शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.

या नऊ तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी शासन स्तरावरील कोणत्याच अधिकाऱ्यांनी तसदी घेतली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे शासन आणि पीकविमा कंपनीच्या गोंधळामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यामुळे आतातरी आम्हाला गेल्या वर्षीच्या पीकविम्याची रक्कम मिळणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

शासनाने पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीकविम्याची नुकसानभरपाई देण्यास सुरवात केली आहे. त्यातही गोंधळ असून यापूर्वी संपूर्ण जिल्ह्यासाठी एकरकमी, एका वेळी येणारी भरपाई या वेळी हप्त्याने मिळणार आहे.

जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. ७९ कोटी १७ लाख ९१ हजार रुपयांचा विमा हप्ता भरला होता, त्यांची संरक्षित रक्कम २४८ कोटी २ लाख ८९ हजार रुपये होती. पलूस तालुक्‍यासाठी रक्कम प्राप्त झाली आहे. या तालुक्‍यातील तेराशे दोन शेतकऱ्यांनी गतवर्षी खरीप पिकांचा विमा उतरवला. यासाठी त्यांची विमा संरक्षित रक्कम २ कोटी २४ लाखांची होती, यासाठी त्यांनी शेतकऱ्यांनी ७ लाख ५९ हजार तर केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी ३१ लाख ५१ हजार असा एकूण ६७ लाख पन्नास हजार रुपयांचा विमा हप्ता भरला होता; मात्र या तालुक्‍यातील १२८० शेतकऱ्यांना भरपाईचा लाभ मिळणार आहे.

त्यांची विमा संरक्षित रक्कम ४ कोटी ४८ लाख रुपये आहे; मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ७ लाख ५९ हजार रुपये भरपाई मंजूर झाली आहे. विमा कंपनीने ही रक्कम जिल्हा बॅंकेला दिली होती. ती बॅंकेने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. मात्र पलूससारख्या सधन तालुक्‍यातील शेतकऱ्यांची नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे.

पीकविम्याची रक्कम द्या; अन्यथा उद्रेक दुष्काळी टापूतील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव, खानापूर तालुक्‍यातील शेतकरी पीकविमा कधी मिळणार आहे, याची चौकशी संबंधित विभागाकडे सातत्याने करत आहेत. कडेगाव, वाळवा, शिराळा, मिरज तालुक्‍यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. संबंधित विभागाने तातडीने पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी; अन्यथा उद्रेक केला जाईल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

मी गेल्या अनेक वर्षांपासून पीकविमा भरतोय. पीकविम्याची रक्कमही मिळाली; मात्र गेल्या दोन वर्षांत पीकविमा योजनेचा लाभच मिळाला नाही. - विठ्ठल चव्हाण, डफळापूर, ता. जत, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT