cotton
cotton  
मुख्य बातम्या

कापूस वेचणी खर्च पाच अन् किलोला दर २५ ते ३० रुपये 

टीम अॅग्रोवन

जळगाव ः मे अखेरीस व जूनच्या सुरुवातीला लागवड केलेल्या पूर्वहंगामी कापूस पिकात अतिपावसाने उमललेली बोंडे काळवंडत आहेत. बोंडे शेतातच सडून १०० टक्के नुकसान होईल, या भीतीने पावसाचा अडथळा पार करीत काही शेतकरी कापसाची वेचणी करून घेत आहेत. परंतु या वेचणीसाठी पाच रुपये प्रतिकिलो मजुरी किंवा एका मजुरास १५० रुपये मजुरी सुमारे साडेचार ते पाच तासांच्या कामासाठी द्यावी लागत आहे. दुसरीकडे या कमी दर्जाच्या (काळवंडलेल्या, लालसर बोंडे) कापसाला व्यापारी जागेवर २५ ते ३० रुपये प्रतिकिलोचा दर देत आहेत. 

मेच्या अखेरीस लागवड केलेल्या कापूस पिकात मोठे नुकसान अतिपावसात झाले आहे. फक्त दोन वेचण्यांनंतर या कापसाचे पीक उपटून फेकावे लागेल, अशी स्थिती सध्या आहे. खानदेश कापसासाठी प्रसिद्ध असून, कापूस प्रमुख पीक आहे. खानदेशात सुमारे नऊ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. यात एकट्या जळगाव जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक पाच लाख २५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. खानदेशात सुमारे सव्वा ते दीड लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाचे (कृत्रिम जलसाठ्याची सुविधा) पीक आहे. 

या महिन्यात सतत पाऊस सुरू आहे. जळगावमधील यावल, रावेर, चोपडा, जळगाव, धरणगाव या भागात तर ढगफुटीसारखा पाऊस मध्यंतरी झाला. नंदुरबारमधील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, धुळे भागातही अतिपावसाचा कहर सुरू आहे. पूर्वहंगामी कापसात कैऱ्या तयार होऊन बोंडे उमलू लागली आणि पावसाने धुमाकूळ सुरू केला. एका एकरात किमान एक ते दीड क्विंटल कापूस आला असता, अशी स्थिती होती. पण पाऊस सुरूच आहे. त्यात बोंडे काळवंडत आहेत. मेहनतीने उभ्या केलेल्या पिकाला वाया जाऊ देणे शक्य नाही, यामुळे अनेक शेतकरी कुटुंब मजुरांच्या मदतीने या काळवंडलेल्या बोंडांची वेचणी करून घेत आहेत. 

काही शेतकरी बोंडे उमलण्याच्या स्थितीत असलेल्या लालसर कैऱ्या कापसाच्या झाडावरून तोडून घेत असून, घरी त्या कैऱ्या फोडून त्यातून कापूस काढत आहेत. यासाठी मजुरी मात्र मोठी लागत आहे. कारण वेचणी करतानाच पाऊस येतो. यात रोज अर्धा तास, १० मिनिटे वाया जातात. शिवाय कापूस ओला होतो. वेचणीची मजुरी पाच रुपये किलो किंवा पाच तासांसाठी १५० रुपये रोज आहे. रोजंदारीमध्ये एक मजूर आठ ते १० किलो कापसाची वेचणी करतो. वेचणी किलोप्रमाणे असली तर ओला कापूस अधिक वजनाचा येत आहे. या एका मजुराला १५० रुपयांपेक्षा अधिक मजुरी एका दिवसासाठी किंवा चार - पाच तासांसाठी मिळत आहे. शेतकऱ्यांना कापूस वेचणीनंतर वाळवावा लागत आहे. वाळविल्यानंतर ज्या कापसाचे वजन वेचणीला १० किलो भरते, त्याचे वजन सहा ते सात किलोच भरत आहे. ओला कापूस वाळविल्यानंतर त्याची खरेदी व्यापारी टाळत आहेत. कमी दर्जाचा कापूस असल्याचे सांगून अडवणूकही केली जात आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन त्यास २५ ते ३० रुपये किलोचा दर देत आहेत.  खर्च आणि दराचा ताळमेळ बसेना  सध्या वेचणीला जो खर्च लागत आहे, तेवढाच किंवा काहीसा अधिक दर कापसाला मिळत आहे. म्हणजेच कापूस वेचणीसाठी एका क्विंटलला (ओला कापूस) एक हजार रुपये खर्च लागतो. तो वाळविल्यानंतर ३० ते ३५ टक्के घटतो. खरेदीला २५ ते ३० रुपये प्रतिकिलोचा दर दिला जात आहे. अर्थातच मजुरी व इतर खर्च वगळून क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपये सध्या सुटत आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. कापसाची वेचणीच परवडणारी नाही, मजूरटंचाई, व्यापाऱ्यांकडून होणारी लूट व इतर समस्यांमुळे काही शेतकऱ्यांनी तर काळवंडलेल्या कापसाची वेचणीच टाळली आहे.  प्रतिक्रिया सध्या वेचणीचा खर्च व कापसाचा दर सारखाच आहे, कारण फारसा पैसा कापूस विक्रीनंतर हाती राहत नाही. पावसामुळे मोठे संकट पूर्वहंगामी कापूस उत्पादकांसमोर उभे राहिले आहे. आम्ही शेतातून काळवंडलेल्या कैऱ्या किंवा बोंडे काढून आणत आहोत. घरात त्या कैऱ्या फोडून त्यातून कापूस काढत आहोत. यात अतिपावसात काही बोंडे शेतातच खराब झाली आहेत.  - बळीराम चौधरी, शेतकरी, यावल (जि.जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT