कापूस
कापूस  
मुख्य बातम्या

कापसाला बोनस देण्याचा विचार

कोजेन्सिस वृत्तसेवा

मुंबई  ः देशातील महत्त्वाची कापूस उत्पादक महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि मध्य प्रदेश ही राज्ये शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या विचारात आहेत. शेतकऱ्यांना हमीभावावर प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरवातीला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती या निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या सूत्रांनी दिली.   देशात कापूस उत्पादनात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यांचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे या चारही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. यातील राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. त्यामुळे कापसाला बोनस देण्याचा निर्णय राजकीय फायद्यासाठीच घेतला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.  केंद्र सरकारने यंदा कापसाच्या हमीभावात १ हजार १३० रुपयांची वाढ केली आहे. मध्यम लांब धाग्याच्या कापसाला ५१५० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर करण्यात आला आहे. तर लांब धाग्यासाठी ५४५० रुपये हमीभाव आहे. ५०० रुपये बोनस धरल्यास या राज्यांतील शेतकऱ्यांना अनुक्रमे ५६५० रुपये आणि ५९५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळेल.    ‘‘महाराष्ट्रात सुरवातीच्या काळात गुलाबी बोंड अळीचा वाढलेला प्रादुर्भाव आता काहीसा नियंत्रणात आला आहे. त्यामुळे यंदा राज्यात उत्पादन बऱ्यापैकी येऊन गुणवत्ताही चांगली राहण्याची शक्यता आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. नवीन हंगामापासून बाजारात येण्यास उशीर होऊन यंदा नोव्हेंबरपासूनच कापूस बाजारात येईल. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढेल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT