काँग्रेसला सर्जिकल स्ट्राइकबाबत शंका : मोदी
काँग्रेसला सर्जिकल स्ट्राइकबाबत शंका : मोदी 
मुख्य बातम्या

काँग्रेसला सर्जिकल स्ट्राइकबाबत शंका : मोदी

टीम अॅग्रोवन

भिलवाडा (राजस्थान), (वृत्तसंस्था) : मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळी सत्तेत असलेली कॉंग्रेसच पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केलेल्या भाजप सरकारला प्रश्‍न विचारत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. २६) केली. नक्षलवाद आणि दहशतवादावरून त्यांनी कॉंग्रेसला आज धारेवर धरले.

पंतप्रधान मोदींनी आज येथे निवडणूक प्रचारसभा घेतली. ‘कॉंग्रेसने देशभक्तीचे धडे दिले आहेत. मात्र, लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करताच त्यांनी पुरावा म्हणून कारवाईचा व्हिडिओ मागितला. जवान आपला जीव हातात घेऊन लढतात, कॅमेरा नाही. कॉंग्रेसच्याच काळात २६/११चा हल्ला झाला होता. या हल्ल्यातील दोषींना शिक्षा होईलच, याबाबत जनतेने सरकारवर विश्‍वास ठेवावा,’ असे मोदी म्हणाले. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना आणि बळी पडलेल्यांच्या दु:खात सहभागी असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

भाजप शासनाच्या काळात नक्षलवाद आणि दहशतवाद यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जात असून, हल्ल्याच्या घटनाही कमी झाल्याचा दावा मोदी यांनी केला. नक्षलवादी हे लहान मुलांच्या हाती शस्त्र देऊन निष्पापांचा बळी घेत आहेत आणि कॉंग्रेस नेते मात्र या नक्षलवाद्यांना क्रांतिकारक असल्याचे प्रमाणपत्र देत आहेत, अशी टीकाही मोदींनी केली. आजच्या संविधान दिनानिमित्त मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या योगदानाचेही स्मरण केले.

मोदी उवाच... निवडणूक जवळ येताच माझ्या जातीबाबत आणि वडिलांबाबत विचारले जाते, पंतप्रधान हा देशातील सर्व जनतेच्या जातींचा प्रतिनिधी असतो,मी कधीही सुटी घेतली नाही, मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी घेऊ शकतो, भाजप सरकारच्या प्रयत्नांमुळे ६५ टक्के गावांमध्ये शौचालय, कॉंग्रेस काम करणार नाही, जात मात्र विचारेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT