बाजार समिती बंदला वऱ्हाडात संमिश्र प्रतिसाद
बाजार समिती बंदला वऱ्हाडात संमिश्र प्रतिसाद 
मुख्य बातम्या

बाजार समिती बंदला वऱ्हाडात संमिश्र प्रतिसाद

टीम अॅग्रोवन

अकोला : शासनाच्या सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बाजार समिती कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. २८) कामकाज बंद ठेवले. या आंदोलनाला वऱ्हाडात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तुलनेने बुलडाणा जिल्‍ह्यात बंदची तीव्रता अधिक होती. खामगावसारख्या मोठ्या बाजार समितीतील लिलावांवर परिणाम झाला. 

शासनाच्या बाजार समितीच्या आर्थिक हिताविरोधातील निर्णयामुळे बाजार समित्यांचे उत्पन्न कमालीचे घटत चालले आहे. यामुळे बऱ्याच बाजार समित्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बिकट झाला. या पार्श्वभूमीवर शासनाने बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासनसेवेत घेऊन त्यांना दिलासा देण्याची मागणी केली. ती मागील दहा वर्षांपासून प्रलंबित असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. याच मागणीसाठी राज्यातील बाजार समितीचे कर्मचारी एकीकडे मुंबईतील आझाद मैदानात धरणे देत आहेत. दुसरीकडे बाजार समित्यांचे कामकाजही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक थोडी कमी झाली. कामकाज मात्र सुरळीत असल्याचे सचिव मालोकार यांनी सांगितले.  अकोटसह इतर बाजार समित्यांमध्येही कामकाजावर फारसा परिणाम दिसून अाला नाही. बुलडाणा जिल्ह्यात मात्र खामगाव, शेगाव, संग्रामपूर सह १३ बाजार समित्याचे कर्मचारी आंदोलनात सहभागी होत असल्याने गुरुवारी धान्य लिलाव बंद राहतील, असे आवाहन संघटनेने आधीच केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवक कमी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT