Compensate oranges to lakhs per hectare
Compensate oranges to lakhs per hectare 
मुख्य बातम्या

संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई द्या

टीम अॅग्रोवन

नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा, मोसंबी फळांची गळ झाली. त्यामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना प्रतिहेक्‍टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी महाऑरेंजने केली आहे. कृषी सचिव एकनाथ डवले यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनानुसार, विदर्भात संत्रा, मोसंबीचे सर्वाधिक क्षेत्र आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात हे क्षेत्र ७० हजार हेक्‍टर असून नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत उर्वरित ३० हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. यावर्षी पावसाची संततधार सुरू असल्याने संत्रा आणि मोसंबी फळांची गळ मोठ्या प्रमाणावर झाली. कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात अमरावती, वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यांत संत्रा, मोसंबी पिकांचे सुमारे सात हजार ८१० हेक्‍टरचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात हे नुकसान त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. विदर्भातील हे मुख्य पीक असून त्याची उत्पादकता आणि उत्पन्नावरच या भागातील अर्थकारण अवलंबून राहते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक बागायतदारांच्या बागेत फळच उरली नाही.   त्याची दखल घेत संत्रा मोसंबी उत्पादकांना नैसर्गिक आपत्तीअंतर्गत हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी केली आहे. कृषी सचिव एकनाथ डवले विदर्भाच्या दौऱ्यावर असताना त्यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी महाऑरेंजचे संचालक राहुल ठाकरे, मनोज जवंजाळ उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT