पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. थंडी कमी झाली असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास आठ सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसानंतर राज्यात हवामान कोरडे राहणार राहील. त्यामुळे थंडीत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (ता.१९) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे नीचांकी १४.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या चार ते दिवसांपासून अरबी समुद्राच्या परिसरात चक्रिय वाऱ्यासाठी पोषक वातावरणाची स्थिती होती. यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण झाले होते. आता ही स्थिती कमीअधिक स्वरूपात असल्याने किमान तापमानात चढउतार असल्याचे चित्र आहे. यामुळे काही भागात थंडी असून अनेक भागांत थंडी गायब झाल्याचीही स्थिती आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात थंडीने पूर्णपणे पाठ फिरविली आहे. त्यात ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे श्रीगोंदा, पुणे भागातही तुरळक पावसाने हजेरी लावली होती. परिणामी किमान तापमानात सरासरीपेक्षा अगदी सात ते आठ अंशांनी वाढ झाली आहे. मात्र किमान तापमानाचा पारा कमी होणार आहे. उत्तर भारतातील दिल्लीसह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, राजस्थान, या भागात थंडीची लाट आली असून, दाट धुके तयार झाले आहे. याबरोबरच २२ जानेवारीपर्यंत हिमालयीन भागात पश्चिमी चक्रावात तयार होणार आहे. त्यामुळे थंडीच्या लाटेमध्ये वाढ होणार आहे. परिणामी उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे वाहणार आहेत. त्यामुळे राज्यात विदर्भासह सर्वच भागात थंडी वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी (ता.१९) सकाळपर्यत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.