द्राक्षावर 'थंडी'चे सावट
द्राक्षावर 'थंडी'चे सावट 
मुख्य बातम्या

द्राक्षावर 'थंडी'चे सावट

Abhijeet Dake

सांगली  ः वाढत्या थंडीमुळे द्राक्षाची अपेक्षित वाढ आणि वजन नाही. त्यातच उत्तर भारतातील थंडीची लाट, बाजारपेठेत मागणी नसल्याने हंगामाच्या सुरवातीलाच द्राक्षांचे चार किलोचे दर २५० वरून थेट १५० रुपयांवर आले आहेत. त्यातच गत सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात द्राक्षाच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी दर घटले असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. निर्यातक्षम द्राक्षांचे पडलेले दर, पश्‍चिम बंगालमधील अस्थिरतेमुळे दलालांचे ट्रक जागेवरच थांबून असल्याचे चित्र आहे.  द्राक्षावर नैसर्गिक संकटे नेहमीचीच. मात्र या वर्षी हंगामाच्या सुरवातीलाच अस्थिर बाजारपेठेचे संकट आले आहे. उत्तर भारत सर्वांत मोठी बाजारपेठ. मात्र अजून तिकडे थंडी आहे. त्यामुळे द्राक्षांना उठाव नाही. पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तणावाचे सावट आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नेपाळ, बांगलादेशच्या सीमा १५ दिवस बंद असतात, त्यामुळे जाणारी द्राक्षे थांबलीत. याचा परिणाम द्राक्ष हंगामावर झाला. दर अचानक कोसळले. उठाव नसल्याने दलालांकडून खरेदी कमी झाली. वाहतूक करणारे ट्रक जागेवरच उभे आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा द्राक्ष पंढरीत सुमारे दीड महिना थंडी होती. या थंडीमुळे द्राक्षाची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यातच वजनही कमी भरू लागले आहे. यामुळे यंदाचे वर्ष द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीचे ठरते आहे. हातातोंडाशी आलेला घास हिसकावला जाऊ नये म्हणून शेतकरी दलालांमागे लागले आहेत. मागणी कमी, पुरवठा जास्त याचा फटका बसण्याचा धोका आहे. दर कोसळल्याने बसणारा फटका एकरी लाखावर आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव तालुक्याचा पूर्व भाग, जत तालुका हा दुष्काळी पट्टा आहे. या भागात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी देऊन बागा जगविल्या. सध्या द्राक्ष विक्रीसाठी माल तयार आहे. परंतु पाण्याची कमतरता आणि वातावरणातील बदलाने द्राक्षाच्या उत्पादनात सुमारे एकरी २ टनाने घट येण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे एकरी एक ते दीड लाखाचे नुकसान होईल.  व्यापाऱ्याकडून दराची कोंडी उत्तर भारतात थंडीची लाट आहे, त्यामुळे मागणी नाही. हे जरी वास्तव असले, तरी इतर राज्यांत द्राक्षाला मागणी नाही असे व्यापाऱ्यांकडून सांगितले जाते आहे. त्यामुळे कमी दरात द्राक्षाची खरेदी सुरू आहे. याचा फटका द्राक्ष उत्पादकाला बसू लागला आहे.  दर असे आहेत...  द्राक्षांना चार किलोच्या पेटीसाठी यंदा कमी दर मिळत आहेत. सोनाका, माणिक चमन १५०-१६०, सुपर १४०-१५०, काळ्या रंगाची शरद ज्योती २००-२२५, असे दर सध्या मिळत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ५०-७५ रुपयांचा फटका बसला आहे. १८ जानेवारीनंतर दुबई, चीन, थायलंड, श्रीलंकेत निर्यात होणाऱ्या द्राक्षांचे दर चक्क ४५ रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. त्याचाही परिणाम देशांतर्गत दरावर झाला आहे.  उत्पादन वाढले, पण दराने मारले सांगली जिल्ह्यात योजनेचे पाणी ज्या भागात फिरले आहे, त्या ठिकाणी द्राक्षाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे चार पैसे अधिक मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, सातत्याने द्राक्षाच्या दरात घसरण होते आहे. उत्पादन वाढले असले तरी दराने मारल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT