नाशिक : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. या परिस्थितीत राज्यातील फळपिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या वाट्याच्या योजनांमधील ५० टक्के निधी अडकून पडला आहे, तो तातडीने राज्य सरकारकडे वर्ग करावा. सध्याची परिस्थिती व झालेले नुकसान यांचा अंदाज घेऊन पुढील वर्षाचे नियोजन करावे, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री श्री.तोमर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे विविध राज्यांचा कृषी विषयक आढावा घेतला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात बुधवारी (ता.८) झालेल्या ‘व्हिसी’त कृषिमंत्री श्री.भुसे यांनी राज्यातील स्थितीची माहिती दिली. कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले की, राज्यातील द्राक्ष, केळी, आंबा, टरबूज, संत्रा ही पिके काढणीसाठी अली आहेत. मात्र अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे. पुरवठा साखळी अडचणीत सापडली आहे. कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर असताना इतर राज्याप्रमाणे खरेदीची करून परताव्याची हमी द्यावी. राज्यात फुलशेती करणारे शेतकरी यांसह कृषीसोबत असलेल्या पूरक उद्योगाच्या पोल्ट्री, दूध व मत्स्यव्यवसाय यासाठी मदतीची गरज आहे, ती केंद्राने लवकरात लवकर पाठवावी अशी मागणी यावेळी केली. राज्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतात व घरात अजून कपाशी पडून आहे. त्याची खरेदी कशी होईल याबाबत लक्ष वेधले. कोरोना लॉकडाऊनमुळे बाजारपेठ नसल्याने शेतमाल पडून आहे, त्यास बाजारपेठ उपलब्ध नाही. शेतकरी मोठ्या मेहनतीने धनधान्य पिकवतो त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे, असेही कृषिमंत्री श्री.भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा अधीक्षक अधिकारी संजीव पडवळ आदी उपस्थित होते. केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेतील मुद्दे व मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.