कोल्हापूर येथे  ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शनिवारी (ता. २७) महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
कोल्हापूर येथे ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शनिवारी (ता. २७) महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. 
मुख्य बातम्या

मजुरांना प्रतिष्ठा देण्याची गरज : चंद्रकांत पाटील

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : शेतीमध्ये मजुरांचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी मजुरांना प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने ‘अॅग्रोवन’चा यंदाचा दिवाळी अंक शेतकऱ्यांना नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ‘अॅग्रोवनच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन श्री. पाटील यांच्या हस्ते ‘सकाळ’च्या येथील कार्यालयात शनिवारी (ता. २७) झाले. त्या वेळी ते बोलत होते. शेतीच्या दृष्टीने कठीण काळ असताना ‘अॅग्रोवन’ने नेहमीच सकारात्मक पत्रकारिता करून शेतकऱ्याचे मनोबल वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न केला, असे श्री. पाटील म्हणाले. एक शेतकरी म्हणून मला ‘अॅग्रोवन’विषयी नेहमीच उत्सुकता असते, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "मी मूळचा शेतकरी आहे. मी दोन वर्षे शेतीत अनेक प्रयोग केलेले आहेत." ‘अॅग्रोवन’ने विविध यशकथांच्या माध्यमातून शेती हा फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो असा विश्‍वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला असल्याचे त्यांनी नमूद केले.

अॅग्रोवन दिवाळी अंक प्रकाशनाचा  video शेतीविषयी विचार करण्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे, यावर श्री. पाटील यांनी भर दिला. ते म्हणाले, की मजुरांची प्रतिष्ठा वाढविणे महत्त्वाचे आहे. आज मजुराला समजा महिन्याला एक लाख रुपये मिळाले तरी त्याला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण आहे. कारण या कामाला प्रतिष्ठा नाही. राज्यातील दुष्काळाच्या बाबतीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी सकाळ प्रकाशनाच्या विविध दिवाळी अंकांची माहिती दिली. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने यंदा १९ दिवाळी अंक प्रकाशित करण्यात येत आहेत. प्रत्येक अंक हा विविध घटकांसाठी व वेगळ्या विषयांचा वेध घेणारा आहे, असे ते म्हणाले. ‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, मजुरांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठेने वागवणे हे या संदर्भात महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. ‘अॅग्रोवन’ने दिवाळी अंकाच्या माध्यमातून या मजूर समस्येवर कशी मात करता येईल, याची मांडणी केली आहे. या संदर्भात प्रयोग करणाऱ्या राज्यभरातील २६ यशकथा या अंकात आहेत, असे ते म्हणाले. या वेळी सकाळ कोल्हापूरचे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, सकाळचे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, सेवा भक्तीचे निवासी संपादक निखिल पंडितराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेदव वाकुरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी उपसंचालक सौ. भाग्यश्री फरांदे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजानन खोत, कृषी विद्यावेत्ता डॉ. अशोक पिसाळ, तळसंदे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख जयवंत जगताप, रामेतीचे नामदेव परीट, शाहू तंत्रमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुमार गुरव, शाहू गूळ संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील, तसेच दिवाळी अंकात ज्यांचा यशकथांचा समावेश आहे. त्यापैकी मिलिंद पाटील, सौ. संजीवनी पाटील, प्रताप चिपळूणकर, राजेंद्र कुलकर्णी, धनाजी गुरव आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT