congress agitation
congress agitation  
मुख्य बातम्या

केंद्र सरकार शेतकरीविरोधी ः थोरात

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे. तमाम शेतकरी आणि कामगार वर्ग सरकारला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा महसूल मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला. केंद्र सरकारच्या कृषी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (ता.५) भव्य रॅली काढण्यात आली.   माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव,  आमदार राजूबाबा आवळे,  आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सुमारे  ५०० हून अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले  होते. शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून दुपारी साडेबाराच्या सुमारास दसरा  चौक  परिसरात रॅली दाखल  झाली. या ठिकाणी शेतकरी विरोधी कृषी कायद्याबाबत काँग्रेसची भूमिका जाहीर करताना श्री. थोरात यांनी केंद्र शासनावर जोरदार टीका केली. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांबाबत घेतलेला निर्णय त्यांच्या हिताचा नाही. त्यामुळे या विरोधात काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. केंद्राच्या या धोरणाला महाराष्ट्र सरकारही विरोध करेल. कृषीविषयक धोरणाबाबत समर्थन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी डांबरी रस्त्यावरून समर्थन करू नये. शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांची परिस्थिती पहावी.

अमरावतीतही आंदोलन अमरावती ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप आदी पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT