मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांना अपमानित करून दिल्लीतून पाठवू नये : राज्यपाल मलिक

सरकारने शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परत पाठवू नये. त्यांना अपमानित करू नये, असे झाले, तर ते पुढील ३०० वर्षेही विसरणार नाहीत, हे लक्षात घ्यावे, अशा शब्दांत मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कान पिळले आहेत.

टीम अॅग्रोवन

बागपत, उत्तर प्रदेश : सरकारने शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परत पाठवू नये. त्यांना अपमानित करू नये, असे झाले, तर ते पुढील ३०० वर्षेही विसरणार नाहीत, हे लक्षात घ्यावे, अशा शब्दांत मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कान पिळले आहेत.  केंद्राचे तीन कृषी कायदे आणि हमीभावाच्या कायद्यासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. २२ जानेवारीपासून सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्याचे पाहून व्यथित झालेल्या राज्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारला अनुभवाचा सल्ला दिला आहे. बागपत येथे कार्यक्रमात आणि नंतर पत्रकारांशी बोलताना राज्यपाल मलिक यांनी आपले मत व्यक्त केले.  ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचा जो सत्यनाश आहे, तो त्यांना माहीत न होता होत आहे. दुसरीकडे कोठेही शेतीमाल विकू शकतात, असा खूप प्रचार केला गेला. हे तर १५ वर्षांपूर्वीचे कायदे आहेत, असेही म्हटले गेले. मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने आज कोणतेही कायदे लागू नाहीत, बाकी बोलण्याच्या गोष्टी आहेत.’’  राज्यपाल मलिक म्हणाले, ‘‘आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर दबाव टाकून, अपमानित करून दिल्लीतून पाठविणे योग्य नाही. तसेही ते रिकाम्या हाती परत जाण्यासाठी आलेले नाहीत आणि जाणारही नाहीत आणि ते गेलेच तर तीनशे वर्षे ते विसरणार नाहीत.’’  राकेश टिकैत यांना अटक होणार होती... २८ जानेवारीला राकेश टिकैत यांच्या अटकेच्या प्रसंगावरून बोलताना राज्यपाल मलिक म्हणाले, की सरकारमधल्या एका मोठ्या माणसाशी बोललो. त्यांना म्हणालो, की ते रडलेत, आज त्यांची अटक करू नका. त्यांच्या घरी हजारो लोक एकत्रित आलेत. मुजफ्फरनगरमध्ये लाखोंच्या रॅलीची तयारी सुरू आहे, हिंसा होण्याची शक्यता आहे. आज त्यांना अटक करू नका, नंतर करा, असा सल्ला मी दिला. हमीभावावर कायदा करा... हमीभावावर कायदा करा, मी स्वत: आंदोलन समाप्तीसाठी प्रयत्न करेन. हमीभावाची मागणी मान्य केली, तर कृषी कायद्यांतील संशोधनासही शेतकरी राजी होतील, सरकारपण याकरिता तयार आहे आणि प्रश्‍नही मार्गी लागेल. - राज्यपाल सत्यपाल मलिक राज्यपाल म्हणाले...

  •     आधी मी शेतकरी आहे, नंतर राज्यपाल
  •     सरकार आणि शेतकरी जवळ यावेत यासाठी प्रयत्न
  •     मी शेतकऱ्यांसमवेत, शेतकऱ्यांच्या मागण्याही योग्य
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Voter Fraud: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात मते वाढवली, निवडणूक आयोग मत चोरांसाठी काम करते; राहुल गांधी

    Vegetable Farming Success : प्रशिक्षणातून भाजीपाला शेतीत तयार केला वार्षिक रोजगार

    Flower Farming Success : अभ्यासपूर्ण गुलाबशेतीतून आर्थिक स्थैर्य, समाधानही

    Nutrient Management: चुनखडीयुक्त जमिनीमध्ये ऊस पिकासाठी पोषक अन्नद्रव्य व्यवस्थापन

    Sharad Pawar | अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, शेतकरी संकटात, सरकारने लक्ष द्यावे- शरद पवार

    SCROLL FOR NEXT